शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

जालना मतदारसंघाचा तिढा सुटणार ? खोतकर माघार घेण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:24 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. मात्र याच मतदारसंघासाठी शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरलेला आहे

मुंबई - शिवसेना-भाजपा युती जाहीर होऊन दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडून शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत आहेत. मात्र लोकसभा मतदारसंघाच्या काही जागांवरुन अद्यापही युतीत अजूनही चर्चा सुरु आहे. त्यातील सर्वाधिक चर्चा होतेय ती म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघाबाबत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. मात्र याच मतदारसंघासाठी शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरलेला आहे. मात्र दानवे यांचा बालेकिल्ला भाजप सोडण्यास तयार नाही. पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांची मनधरणी केल्याची माहिती आहे.  

औंरंगाबादमध्ये आज शिवसेना-भाजचा संयुक्त मेळावा होणार आहे. मात्र त्याआधी शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडेल. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं यावर अर्जुन खोतकर यांचे लक्ष आहे. खोतकर माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असली तरी रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक सोपी नसणार आहे.   

रावसाहेब दानवेंनी सत्ताकाळात खोट्या केसेस कार्यकर्त्यांवर टाकल्या आहेत त्यामुळे खोतकर आणि शिवसैनिक नाराज आहेत. बैठकीनंतर अर्जुन खोतकर यांनी माघार जरी घेतली तरी कार्यकर्त्यांच्या मनातील सल दूर करणे नेतृत्वाला कठीण आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक रावसाहेब दानवेंसाठी जड जाणार हे मानलं जातंय. 

याआधी खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे, अजूनही युतीच्या जागा वाटपात कोणताही निर्णय झाला नाही. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहे असं भाष्य केलं होतं. त्याचसोबत काँग्रेसमध्ये अर्जुन खोतकर प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरु होती. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनीही लवकरच गुड न्यूज कळेल असं पत्रकारांना सांगितल्यामुळे खोतकर काँग्रेसच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढवतील असं बोललं जातं होत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकArjun Khotkarअर्जुन खोतकरShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक