शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

lok sabha election 2019 : खोतकरांच्या माघारीने ‘कहीं खुशी कहीं गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:11 IST

जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

- संजय देशमुख 

जालना : गेल्या तीन महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटणारे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याचे परिणाम हे युतीसाठी सकारात्मक आहेत. यातून खोतकरांनी बरेच काही पदरात पाडून घेतले असले तरी जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

खोतकरांच्या माघारीने काँग्रेसही अप्रत्यक्षपणे अडचणीत सापडल्याचे वास्तव आहे. खोतकरांनी माघार न घेता दानवेंशी दोन हात करावेत, अशी अनेकांची इच्छा होती. ही इच्छा खोतकरांनी चांगलीच तापतही ठेवली होती. शेवटपर्यंत आपण काय करणार, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. खऱ्या अर्थाने सहकारमंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे विश्ोष दूत म्हणून आल्यावरच खोतकरांची तलवार म्यान झाली होती. मात्र अचानकपणे आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले असते तर ते शिवसैनिकांसाठी क्लेशकारक ठरले असते. त्यामुळे त्यांनी माघारीचा मुद्दा चांगलाच ताणून धरला होता. मात्र, आता हा सर्व इतिहास झाला असून मनोमिलन होताच खोतकर यांनी सोमवारी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे खोतकरांमधील हा बदल निश्चित चर्चेचा विषय ठरला. खोतकरांनी ज्या मुद्यांवर माघार घेतली, त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फासे टाकले आहेत. तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, तूर घोटाळा, दुकानांचे झालेले लिलाव आणि रामनगर सहकारी साखर कारखान्याची जमीन हे हुकमी पत्ते भाजपकडे अर्थात रावसाहेब दानवेंकडे होते. त्यामुळे जास्त न ताणता खोतकर यांनी माघारीचे अस्त्र स्वीकारले. 

काँग्रेससमोर पेचखोतकरांच्या माघारीने काँग्रेसमध्येही चलबिचल झाली आहे. खोतकर येणार-येणार अशा गोबेल्स नीतीचा सक्षमपणे उपयोग करून काँग्रेसच्या नेतृत्वालाही त्यांनी गाफील ठेवल्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे. खोतकरांचे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे दृढ संबंध सर्वश्रुत आहेत. त्यातच आता माजी आ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. मात्र, त्यांची इच्छा नसल्याने नवीन पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.  

हे नवे नाही...खोतकरांच्या माघारीबद्दल माजी आ. कैलास गोरंट्याल यांना विचारले असता ते म्हणाले की, हा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर आपण भाष्य करणार नाही. एवढे करूनही जर आगामी विधानसभेत ते माझ्या विरोधात उभे राहिले तर हे काही माझ्यासाठी नवीन नसल्याचे गोरंट्याल म्हणाले.  

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरRaosaheb Danweरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालना