शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

lok sabha election 2019 : खोतकरांच्या माघारीने ‘कहीं खुशी कहीं गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:11 IST

जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

- संजय देशमुख 

जालना : गेल्या तीन महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटणारे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याचे परिणाम हे युतीसाठी सकारात्मक आहेत. यातून खोतकरांनी बरेच काही पदरात पाडून घेतले असले तरी जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

खोतकरांच्या माघारीने काँग्रेसही अप्रत्यक्षपणे अडचणीत सापडल्याचे वास्तव आहे. खोतकरांनी माघार न घेता दानवेंशी दोन हात करावेत, अशी अनेकांची इच्छा होती. ही इच्छा खोतकरांनी चांगलीच तापतही ठेवली होती. शेवटपर्यंत आपण काय करणार, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. खऱ्या अर्थाने सहकारमंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे विश्ोष दूत म्हणून आल्यावरच खोतकरांची तलवार म्यान झाली होती. मात्र अचानकपणे आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले असते तर ते शिवसैनिकांसाठी क्लेशकारक ठरले असते. त्यामुळे त्यांनी माघारीचा मुद्दा चांगलाच ताणून धरला होता. मात्र, आता हा सर्व इतिहास झाला असून मनोमिलन होताच खोतकर यांनी सोमवारी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे खोतकरांमधील हा बदल निश्चित चर्चेचा विषय ठरला. खोतकरांनी ज्या मुद्यांवर माघार घेतली, त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फासे टाकले आहेत. तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, तूर घोटाळा, दुकानांचे झालेले लिलाव आणि रामनगर सहकारी साखर कारखान्याची जमीन हे हुकमी पत्ते भाजपकडे अर्थात रावसाहेब दानवेंकडे होते. त्यामुळे जास्त न ताणता खोतकर यांनी माघारीचे अस्त्र स्वीकारले. 

काँग्रेससमोर पेचखोतकरांच्या माघारीने काँग्रेसमध्येही चलबिचल झाली आहे. खोतकर येणार-येणार अशा गोबेल्स नीतीचा सक्षमपणे उपयोग करून काँग्रेसच्या नेतृत्वालाही त्यांनी गाफील ठेवल्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे. खोतकरांचे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे दृढ संबंध सर्वश्रुत आहेत. त्यातच आता माजी आ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. मात्र, त्यांची इच्छा नसल्याने नवीन पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.  

हे नवे नाही...खोतकरांच्या माघारीबद्दल माजी आ. कैलास गोरंट्याल यांना विचारले असता ते म्हणाले की, हा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर आपण भाष्य करणार नाही. एवढे करूनही जर आगामी विधानसभेत ते माझ्या विरोधात उभे राहिले तर हे काही माझ्यासाठी नवीन नसल्याचे गोरंट्याल म्हणाले.  

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरRaosaheb Danweरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालना