शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे, 'मुंगेरीलाल के हसीन सपने' : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:30 IST

मुख्यमंत्र्यांची खोचक टीका

जालना : काँग्रेसने गेल्या ६० वर्षामध्ये गरीबी हटावचा नारा दिला होता. परंतु, देशातील गरीबी हटण्यापेक्षा ती अधिक वाढली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा गरिबी हटविण्याचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात घेतला आहे. हे म्हणजे, 'मुंगेरीलालके हसीन सपने' असल्याची खोचक  टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २) जालना येथे आयोजित सभेत केली. 

मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यात आले होते. यावेळी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. संदिपान भुमरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. अतुल सावे, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये शेवटच्या घटकांपर्यंत विकासाच्या योजना पोहचविल्या आहेत. मोदी सरकारच्या काळात दुष्काळासाठी चार हजार ७०० कोटी रूपये मिळाले असून त्यामुळे भरीव मदत झाली आहे. 

खोतकर पांडवांच्याच कळपात मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात तेढ निर्माण झाले होते. परंतु, पार्थरूपी उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली. आणि काँग्रेसच्या वाटेवर असलेले खोतकर हे पांडवांच्याच कळपात राहिले असा मिश्किल टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९jalna-pcजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा