शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तळणी परिसरात अद्रक, हळद काढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:54 IST

तळणी परिसरात उन्हाची तमा न बाळगता शेतकरी कुटुंबांकडून अद्रक, हळद काढणीला वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढत आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. असे असताना तळणी परिसरात उन्हाची तमा न बाळगता शेतकरी कुटुंबांकडून अद्रक, हळद काढणीला वेग आला आहे.ग्रामीण भागात शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून अद्रक- हळदीकडे पाहीले जाते. तळणी व परिसरात मागील पाच वर्षांपासून अद्रक व हळद घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत झाल्याने जानेवारीत जलसाठे, विहिरीनी तळ गाठला होता. तरीही पाण्याचे योग्य नियोजन करुन अद्रक व हळद पीक शेतकºयांनी जोपासले. यावर्षी जूनमध्ये हळद- अद्रक लागवड मोठ्या प्रमाणात होणार असल्याने अद्रक - हळदीच्या बियाणाला मोठी मागणी आहे. हळदीच्या बियाणाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. तर अद्रकाला सहा हजारांचा भाव मिळत आहे. शेतकरी अद्रक- हळदीच्या काढणीनंतर बियाणांच्या विक्रीला पसंती देतात. त्यानंतर उरलेल्या हळदीच्या बियाणांना उकडून वाळत घातले जाते. यासाठी खर्च व वेळ वाढतो. वाळलेल्या हळदीला ७ हजार प्रति क्विंटल भाव मिळत आहे.वाशिम, रिसोड , हिंगोली या भागातील व्यापारी हळदीचे कच्चे व वाळलेले बियाणे शेतक-यांकडून खरेदी करीत आहेत.यावर्षी कमी पाणी असतानाही अद्रक व हळदीचे एकरी १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न मिळाले. हळदीसाठी एकरी ४० ते ५० हजाराचा खर्च तर अद्रकाला एकरी १ लाखावर खर्च झाला असून हळदीतून एकरी दीड लाखांपर्यंत उत्पन्न तर अद्रकाचे एकरी ६ लाखांवर मिळाले असल्याचे युवा शेतकरी संजय भाऊराव सरकटे, वामन कुकडे, शिवाजी सरकटे, प्रदीप लाड, प्रकाश सरकटे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीSun strokeउष्माघात