शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तळणी परिसरात अद्रक, हळद काढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:54 IST

तळणी परिसरात उन्हाची तमा न बाळगता शेतकरी कुटुंबांकडून अद्रक, हळद काढणीला वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढत आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. असे असताना तळणी परिसरात उन्हाची तमा न बाळगता शेतकरी कुटुंबांकडून अद्रक, हळद काढणीला वेग आला आहे.ग्रामीण भागात शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून अद्रक- हळदीकडे पाहीले जाते. तळणी व परिसरात मागील पाच वर्षांपासून अद्रक व हळद घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत झाल्याने जानेवारीत जलसाठे, विहिरीनी तळ गाठला होता. तरीही पाण्याचे योग्य नियोजन करुन अद्रक व हळद पीक शेतकºयांनी जोपासले. यावर्षी जूनमध्ये हळद- अद्रक लागवड मोठ्या प्रमाणात होणार असल्याने अद्रक - हळदीच्या बियाणाला मोठी मागणी आहे. हळदीच्या बियाणाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. तर अद्रकाला सहा हजारांचा भाव मिळत आहे. शेतकरी अद्रक- हळदीच्या काढणीनंतर बियाणांच्या विक्रीला पसंती देतात. त्यानंतर उरलेल्या हळदीच्या बियाणांना उकडून वाळत घातले जाते. यासाठी खर्च व वेळ वाढतो. वाळलेल्या हळदीला ७ हजार प्रति क्विंटल भाव मिळत आहे.वाशिम, रिसोड , हिंगोली या भागातील व्यापारी हळदीचे कच्चे व वाळलेले बियाणे शेतक-यांकडून खरेदी करीत आहेत.यावर्षी कमी पाणी असतानाही अद्रक व हळदीचे एकरी १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न मिळाले. हळदीसाठी एकरी ४० ते ५० हजाराचा खर्च तर अद्रकाला एकरी १ लाखावर खर्च झाला असून हळदीतून एकरी दीड लाखांपर्यंत उत्पन्न तर अद्रकाचे एकरी ६ लाखांवर मिळाले असल्याचे युवा शेतकरी संजय भाऊराव सरकटे, वामन कुकडे, शिवाजी सरकटे, प्रदीप लाड, प्रकाश सरकटे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीSun strokeउष्माघात