शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

तळणी परिसरात अद्रक, हळद काढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:54 IST

तळणी परिसरात उन्हाची तमा न बाळगता शेतकरी कुटुंबांकडून अद्रक, हळद काढणीला वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढत आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. असे असताना तळणी परिसरात उन्हाची तमा न बाळगता शेतकरी कुटुंबांकडून अद्रक, हळद काढणीला वेग आला आहे.ग्रामीण भागात शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून अद्रक- हळदीकडे पाहीले जाते. तळणी व परिसरात मागील पाच वर्षांपासून अद्रक व हळद घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत झाल्याने जानेवारीत जलसाठे, विहिरीनी तळ गाठला होता. तरीही पाण्याचे योग्य नियोजन करुन अद्रक व हळद पीक शेतकºयांनी जोपासले. यावर्षी जूनमध्ये हळद- अद्रक लागवड मोठ्या प्रमाणात होणार असल्याने अद्रक - हळदीच्या बियाणाला मोठी मागणी आहे. हळदीच्या बियाणाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. तर अद्रकाला सहा हजारांचा भाव मिळत आहे. शेतकरी अद्रक- हळदीच्या काढणीनंतर बियाणांच्या विक्रीला पसंती देतात. त्यानंतर उरलेल्या हळदीच्या बियाणांना उकडून वाळत घातले जाते. यासाठी खर्च व वेळ वाढतो. वाळलेल्या हळदीला ७ हजार प्रति क्विंटल भाव मिळत आहे.वाशिम, रिसोड , हिंगोली या भागातील व्यापारी हळदीचे कच्चे व वाळलेले बियाणे शेतक-यांकडून खरेदी करीत आहेत.यावर्षी कमी पाणी असतानाही अद्रक व हळदीचे एकरी १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न मिळाले. हळदीसाठी एकरी ४० ते ५० हजाराचा खर्च तर अद्रकाला एकरी १ लाखावर खर्च झाला असून हळदीतून एकरी दीड लाखांपर्यंत उत्पन्न तर अद्रकाचे एकरी ६ लाखांवर मिळाले असल्याचे युवा शेतकरी संजय भाऊराव सरकटे, वामन कुकडे, शिवाजी सरकटे, प्रदीप लाड, प्रकाश सरकटे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीSun strokeउष्माघात