शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या सभांचे २० पथकांमार्फत होतेय चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:11 IST

आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचाराच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. दुसरीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९५० हा टोलफ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.विधानसभा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्याच पक्षाचा विजय व्हावा, यासाठी उमेदवारांसह राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेतेही प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. सभा, कॉर्नर बैठका, मतदारांच्या थेट भेटींसह सोशल मीडियावरही प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडून २० व्हीएसटी पथकांमार्फत व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. पथकांमार्फत होणाऱ्या व्हिडिओ चित्रीकरणाची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक करीत आहे. याचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला जात आहे. त्याशिवाय वाहनांची तपासणीही ठिकठिकाणी केली जात आहे.मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, पोलीस बंदोबस्त, पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, लाईट, फर्निचर यासह इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.वोटर स्लीप वाटपाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, मतदान जागृती, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक विभागाकडून वोटर गाईड देण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात एक वोटर गाईड देण्यात येणार आहे. मतदारांना कोणतीही अडचण आली तर ती सोडविण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आवश्यक ती दक्षता घेत आहे.सात ठिकाणी सखी केंदे्रजिल्ह्यात सात मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून राहणार आहेत. येथील संपूर्ण कामकाज महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत. त्यांच्यासाठीही आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.३८ संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यात ३८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय काटेकोर बंदोबस्तही या केंद्रांवर लावण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCode of conductआचारसंहिता