शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नेत्यांच्या सभांचे २० पथकांमार्फत होतेय चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:11 IST

आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचाराच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. दुसरीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९५० हा टोलफ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.विधानसभा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्याच पक्षाचा विजय व्हावा, यासाठी उमेदवारांसह राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेतेही प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. सभा, कॉर्नर बैठका, मतदारांच्या थेट भेटींसह सोशल मीडियावरही प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडून २० व्हीएसटी पथकांमार्फत व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. पथकांमार्फत होणाऱ्या व्हिडिओ चित्रीकरणाची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक करीत आहे. याचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला जात आहे. त्याशिवाय वाहनांची तपासणीही ठिकठिकाणी केली जात आहे.मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, पोलीस बंदोबस्त, पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, लाईट, फर्निचर यासह इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.वोटर स्लीप वाटपाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, मतदान जागृती, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक विभागाकडून वोटर गाईड देण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात एक वोटर गाईड देण्यात येणार आहे. मतदारांना कोणतीही अडचण आली तर ती सोडविण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आवश्यक ती दक्षता घेत आहे.सात ठिकाणी सखी केंदे्रजिल्ह्यात सात मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून राहणार आहेत. येथील संपूर्ण कामकाज महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत. त्यांच्यासाठीही आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.३८ संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यात ३८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय काटेकोर बंदोबस्तही या केंद्रांवर लावण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCode of conductआचारसंहिता