शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

नेत्यांच्या सभांचे २० पथकांमार्फत होतेय चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:11 IST

आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचाराच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. दुसरीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९५० हा टोलफ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.विधानसभा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्याच पक्षाचा विजय व्हावा, यासाठी उमेदवारांसह राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेतेही प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. सभा, कॉर्नर बैठका, मतदारांच्या थेट भेटींसह सोशल मीडियावरही प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडून २० व्हीएसटी पथकांमार्फत व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. पथकांमार्फत होणाऱ्या व्हिडिओ चित्रीकरणाची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक करीत आहे. याचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला जात आहे. त्याशिवाय वाहनांची तपासणीही ठिकठिकाणी केली जात आहे.मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, पोलीस बंदोबस्त, पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, लाईट, फर्निचर यासह इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.वोटर स्लीप वाटपाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, मतदान जागृती, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक विभागाकडून वोटर गाईड देण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात एक वोटर गाईड देण्यात येणार आहे. मतदारांना कोणतीही अडचण आली तर ती सोडविण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आवश्यक ती दक्षता घेत आहे.सात ठिकाणी सखी केंदे्रजिल्ह्यात सात मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून राहणार आहेत. येथील संपूर्ण कामकाज महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत. त्यांच्यासाठीही आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.३८ संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यात ३८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय काटेकोर बंदोबस्तही या केंद्रांवर लावण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCode of conductआचारसंहिता