शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जालन्यात बांधकाम परवानगीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून जालना नगर पालिकेला पूर्णवेळ नगररचनाकार मिळत नसल्याने शहरातील बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या काही महिन्यांपासून जालना नगर पालिकेला पूर्णवेळ नगररचनाकार मिळत नसल्याने शहरातील बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकारच्या नगररचना विभागाकडून हे पद पालिकेत भरले जाते. मात्र, जालन्यात कोणताच अधिकारी येण्यास उत्सुक नसल्याने बांधकाम व्यावसायिक आणि नागरिक हैराण झाले आहेत.जालना पालिकेत गेल्या चार ते पाच वर्षापासून पूर्णवेळ नगररचना काराचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभारी पदभार गेली कित्येक वर्षे जिल्हा नगर रचनाकाराकडे आहे. मध्यंतरी तर त्यांच्याकडील पदभारही त्यांनी सोडून दिला आहे. महिन्याभर एक नगरचना विभागातून अधिकारी आले होते. मात्र त्यांची देखील आता बदली झाली आहे. औरंगाबाद येथील गोडघासे यांच्याकडे हा पदभार होता, मात्र ते देखील येथे येण्यास उत्सुक नाहीत. एकूणच पालिकेने सर्व बांधकाम परवागीची प्रक्रिया ही आॅनलाईन केली आहे. मात्र ही प्रक्रिया कुचकामी ठरत असल्याचे वास्तव आहे.या संदर्भात लोकमतने पुणे येथील नगररचना विभागातील संचालक शेंडे यांच्याशी सपंर्क केला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा नगररचनाकारांकडे विचारणा केली असता, माझ्याकडे असलेला प्रभारी पदभार मी केव्हाच सोडल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागाप्रमाणेच अन्य विभागातही पािलकेत अशीच स्थिती असल्याने त्याच्या एकूणच कामकाजावर परिणाम होत आहे.बांधकाम परवानगी न मिळाल्याने अनेकांचे बँकेकडून घेण्यात येणारी कर्जप्रकरणे अडचणीत सापडली आहेत. जवळपास ५०० पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये बांधकाम परवानगी न मिळाल्याने बांधकाम व्यावसायिक तसेच नागरिकांची मोठी डोकेदुखी होत आहे. के्रडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेने या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना भेटून निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने ही संघटनाही हतबल झाली आहे.नगर रचना : अधिकारी येण्यास धजेनाराज्य सरकारकडे या संदर्भातील तक्रारी या खाजगी पातळीवरून थेट मंत्रालयात गेल्या आहेत. तेथून नगररचना विभागाला सांगण्यात येऊनही या विभागातील अधिकारी नेमेके कोणत्या कारणामुळे जालना पालिकेत येत नाहीत, हा संशोधनाचा विषय असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकार अर्थात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीच आता लक्ष घालून थेट नगररचना विभागाच्या सचिवांनाच साकडे घालून हे पद भरल्यास मार्ग निघू शकेल असे बोलेले जात आहे.नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल तसेच त्यांचे पती आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी पालिकेतील ४२ महत्वाची पदे भरण्यासाठी शासन दरबारी मोठा पाठपुरावा केला. त्यांना कुठूनच साथ मिळत नसल्याने ते देखील वैतागले आहेत.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदState Governmentराज्य सरकार