शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात बांधकाम परवानगीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून जालना नगर पालिकेला पूर्णवेळ नगररचनाकार मिळत नसल्याने शहरातील बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या काही महिन्यांपासून जालना नगर पालिकेला पूर्णवेळ नगररचनाकार मिळत नसल्याने शहरातील बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकारच्या नगररचना विभागाकडून हे पद पालिकेत भरले जाते. मात्र, जालन्यात कोणताच अधिकारी येण्यास उत्सुक नसल्याने बांधकाम व्यावसायिक आणि नागरिक हैराण झाले आहेत.जालना पालिकेत गेल्या चार ते पाच वर्षापासून पूर्णवेळ नगररचना काराचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभारी पदभार गेली कित्येक वर्षे जिल्हा नगर रचनाकाराकडे आहे. मध्यंतरी तर त्यांच्याकडील पदभारही त्यांनी सोडून दिला आहे. महिन्याभर एक नगरचना विभागातून अधिकारी आले होते. मात्र त्यांची देखील आता बदली झाली आहे. औरंगाबाद येथील गोडघासे यांच्याकडे हा पदभार होता, मात्र ते देखील येथे येण्यास उत्सुक नाहीत. एकूणच पालिकेने सर्व बांधकाम परवागीची प्रक्रिया ही आॅनलाईन केली आहे. मात्र ही प्रक्रिया कुचकामी ठरत असल्याचे वास्तव आहे.या संदर्भात लोकमतने पुणे येथील नगररचना विभागातील संचालक शेंडे यांच्याशी सपंर्क केला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा नगररचनाकारांकडे विचारणा केली असता, माझ्याकडे असलेला प्रभारी पदभार मी केव्हाच सोडल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागाप्रमाणेच अन्य विभागातही पािलकेत अशीच स्थिती असल्याने त्याच्या एकूणच कामकाजावर परिणाम होत आहे.बांधकाम परवानगी न मिळाल्याने अनेकांचे बँकेकडून घेण्यात येणारी कर्जप्रकरणे अडचणीत सापडली आहेत. जवळपास ५०० पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये बांधकाम परवानगी न मिळाल्याने बांधकाम व्यावसायिक तसेच नागरिकांची मोठी डोकेदुखी होत आहे. के्रडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेने या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना भेटून निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने ही संघटनाही हतबल झाली आहे.नगर रचना : अधिकारी येण्यास धजेनाराज्य सरकारकडे या संदर्भातील तक्रारी या खाजगी पातळीवरून थेट मंत्रालयात गेल्या आहेत. तेथून नगररचना विभागाला सांगण्यात येऊनही या विभागातील अधिकारी नेमेके कोणत्या कारणामुळे जालना पालिकेत येत नाहीत, हा संशोधनाचा विषय असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकार अर्थात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीच आता लक्ष घालून थेट नगररचना विभागाच्या सचिवांनाच साकडे घालून हे पद भरल्यास मार्ग निघू शकेल असे बोलेले जात आहे.नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल तसेच त्यांचे पती आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी पालिकेतील ४२ महत्वाची पदे भरण्यासाठी शासन दरबारी मोठा पाठपुरावा केला. त्यांना कुठूनच साथ मिळत नसल्याने ते देखील वैतागले आहेत.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदState Governmentराज्य सरकार