शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

संवादाचा अभाव धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:42 IST

परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.

प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहदंबा साहित्यनगरी : ‘परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.येथील बगडिया इंटरनॅशनल येथे उभारलेल्या आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरीत आयोजित १२ वे तपपूर्ती अ. भा. महानुभाव साहित्य संमेलनात आज सायंकाळी झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बडवे बोलत होते. ‘धर्म सामंजस्य : काळाची अपरिहार्य गरज’ विषयावरील या परिसंवादात अनिल शेवाळकर (कपाटे), प्रा. मा. रा. लामखडे, माजी वनमंत्री सुरेंद्र भुयार आणि प्रा. बसवराज कोरे यांनी सहभागी होवून विचार मांडले.प्रा. मा. रा. लाकखडे यांनी बहुधर्मी, बहुसंप्रदायी, बहुभाषी असलेल्या आपल्या देशातील परंपरा विसंवादी बनल्याने वातावरण कलुषित होत असल्याचे नमूद केले. एका बाजूला धार्मिक धु्रवीकरण तर दुसऱ्या बाजुला धर्मनिरपेक्षतेचा आग्रह हे वर्तमान वास्तव असून, त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचा इशारा देत प्रा. लामखडे म्हणाले की, धर्माने कट्टरतावादाने नव्हे तर समानतेच्या मार्गानेच सर्वांचे हित व कल्याण साधले जाऊ शकेल. धार्मिक सामंजस्यच प्रगतीला पोषक असते यावर त्यांनी भर दिला.अनिल शेवाळकर (कपाटे) यांनी श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान व शिकवण या अंगाने लिखित भाषण वाचून दाखविले. पूर्वी आस्तिक व नास्तिक हे दोनच प्रवाह होते. परंतु, आता तिसरा स्वच्छंदी प्रवाह निर्माण झाला असून तो हावी होऊ लागला आहे.अध्यात्माच्या अंगाने त्यास अपेक्षित वळण देणे स्पष्ट आणि आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा. डॉ. ऋषिबाबा शिंदे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक