शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संवादाचा अभाव धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:42 IST

परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.

प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहदंबा साहित्यनगरी : ‘परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.येथील बगडिया इंटरनॅशनल येथे उभारलेल्या आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरीत आयोजित १२ वे तपपूर्ती अ. भा. महानुभाव साहित्य संमेलनात आज सायंकाळी झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बडवे बोलत होते. ‘धर्म सामंजस्य : काळाची अपरिहार्य गरज’ विषयावरील या परिसंवादात अनिल शेवाळकर (कपाटे), प्रा. मा. रा. लामखडे, माजी वनमंत्री सुरेंद्र भुयार आणि प्रा. बसवराज कोरे यांनी सहभागी होवून विचार मांडले.प्रा. मा. रा. लाकखडे यांनी बहुधर्मी, बहुसंप्रदायी, बहुभाषी असलेल्या आपल्या देशातील परंपरा विसंवादी बनल्याने वातावरण कलुषित होत असल्याचे नमूद केले. एका बाजूला धार्मिक धु्रवीकरण तर दुसऱ्या बाजुला धर्मनिरपेक्षतेचा आग्रह हे वर्तमान वास्तव असून, त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचा इशारा देत प्रा. लामखडे म्हणाले की, धर्माने कट्टरतावादाने नव्हे तर समानतेच्या मार्गानेच सर्वांचे हित व कल्याण साधले जाऊ शकेल. धार्मिक सामंजस्यच प्रगतीला पोषक असते यावर त्यांनी भर दिला.अनिल शेवाळकर (कपाटे) यांनी श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान व शिकवण या अंगाने लिखित भाषण वाचून दाखविले. पूर्वी आस्तिक व नास्तिक हे दोनच प्रवाह होते. परंतु, आता तिसरा स्वच्छंदी प्रवाह निर्माण झाला असून तो हावी होऊ लागला आहे.अध्यात्माच्या अंगाने त्यास अपेक्षित वळण देणे स्पष्ट आणि आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा. डॉ. ऋषिबाबा शिंदे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक