शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईसाठी लाखावर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:23 IST

बोंडअळीने बाधित कपाशी पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील एक लाखावर शेतक-यांनी आतापर्यंत ‘जी’ फार्म नमुन्यात कृषी विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

जालना : जिल्ह्यातील दोन लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीमुळे बाधित झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीने बाधित कपाशी पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील एक लाखावर शेतक-यांनी आतापर्यंत ‘जी’ फार्म नमुन्यात कृषी विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.जिल्ह्यात यंदा दोन लाख ७८ हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली होती. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांनी धडपड करून कपाशी पीक जगविले. त्यानंतर झालेल्या पावसाचा कपाशीला चांगला फायदा झाला. मात्र, परतीच्या पावसामुळे ऐन वेचणीस आलेल्या कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीही शेतक-यांनी मोठ्या हिमतीने कपाशीची निगा घेतली. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या फवारणीवर मोठा खर्च केला. मात्र, गुलाबी बोंडअळीमुळे आता जिल्ह्यातील सर्वच कपाशी पिकांचे क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने ‘जी’ फॉर्म भरण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू केली आहे. हा फॉर्म भरताना शेतक-यांना तक्रार अर्जासोबत बियाणे खरेदी केल्याच्या पावतीबरोबर सातबारा, एकूण जमिनीचा दाखला, कुठल्या कीटकनाशकांची फवारणी केली याची सर्व माहिती भरावी लागत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतक-यांकडे बियाणे खरेदीच्या पावत्या नसल्याने अर्ज भरताना मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर जी फॉर्म उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे निर्देश असतानाही या फार्मसाठी शेतक-यांना तालुका कृषी कार्यालयात यावे लागत आहे. काही ठिकाणी सहा पानांच्या ‘जी’ फॉर्मसाठी दहा रुपये घेतले जात आहेत. बोंडअळीने कपाशी बाधित झालेल्या एक लाखावर शेतक-यांनी आतापर्यंत तक्रार अर्ज दाखल केले असून, ही संख्या वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाचे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी सयप्पा गरंडे यांनी दिली. आता कृषी विभाग तालुकानिहाय पथके स्थापन करून बाधित शेतक-यांचे कपाशी पिकांचे पंचनामे करून ‘एच’ फॉर्म नमुन्यात माहिती भरणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर अशाच प्रकारच्या ‘आय’ फॉर्ममध्ये ही कृषी आयुक्तांकडे ही माहिती पाठवली जाणार आहे. त्यानंतर कृषी आयुक्त स्तरावरून संबंधित बियाणे कंपनीकडे नुकसान भरपाई दावा केला जाणार आहे. संबंधित कंपनीने यास नकार दिल्यास शेतकºयांच्या बाजूने अशी ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचे एका जबाबदार अधिका-याने सांगितले.कंपनीवरील कारवाईसाठी तक्रार अर्जमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोंडअळीबाधित कपाशी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे कृषी विभागामार्फत सरसकट केले जाणार आहेत. पंचनाम्यानंतर बाधित शेतक-यांना केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून किंवा राज्य सरकारकडून मदत मिळू शकेल. मात्र, संबंधित सीड्स कंपनीकडे भरपाई दाव्यासाठी शेतक-यांना ‘जी’ फॉर्म नमुन्यातील अर्ज भरावा लागेल, असे जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी स्पष्ट केले...........................३० टक्के नुकसान झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून म्हणजेच केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस पिकाचा थेट पंचनामा करण्यात येत आहे.- शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना.......................महिको कंपनीविरुद्ध गुन्हाबदनापूर पोलीस ठाण्यात महिको सीड्स कंपनीविरुद्ध महाराष्ट्र कापसून अधिनियम २००९, तसेच भादवी ३२० नुसार फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने वितरित केलेल्या बीटी कपाशी बियाण्यांमध्ये बोलगार्ड दोन (बीजी दोन) या कमकुवत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उगवण चांगली झालेली असतानाही कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. सदोष बीटी तंत्रज्ञानाच्या बियाण्यामुळे कपाशी उत्पादक शेतकºयांची फसवणूक होऊन मोठ नुसकसान झाले, असे कृषी विभागातील जिल्हा गुणनियंत्रक सयप्पा गरंडे यांनी, या सदंर्भात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. तक्रार दाखल करण्यापूर्वी कृषी विभागाच्या तालुका व जिल्हा गुणनियंत्रणक पथकाने बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील शेतकरी अशोक ज्ञानदेव मुटकुळे यांच्या शेतातील पॅशन बीजी -२ व बलराज बीजी- २ या बोंडअळीने बाधित कपाशी वाणांचे पंचनामे केले होते. पंचनाम्यात मुटकुळे यांच्या शेतातील ०. ६० हेक्टर क्षेत्रावरील ७८ टक्के कपाशी पीक बाधित झाल्याचे समोर आले. त्यामुळे या शेतकºयाचे ६० हजारांचे नुकसान झाले. या महिको सीड्स कंपनी जबाबदार असल्याने कंपनीसह जबाबदार व्यक्तींवर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहेत......................