शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सरकारच्या धोरणा विरोधात कामगार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:11 IST

सरकार उपाय योजना करण्याएैवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप कामगार नेते अण्णा सावंत यांनी मोर्चानंतर आयोजित सभेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळेकामगारांवर बेकारीची वेळ आली आहे. एकूणच शेतमजूर हाताला काम नसल्याने हवालदिल असून, शहरातील बेरोजगारांवरही बेकारीची कु-हाड कोसळली आहे. असे असताना सरकार त्यावर उपाय योजना करण्याएैवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप कामगार नेते अण्णा सावंत यांनी मोर्चानंतर आयोजित सभेत केला.यावेळी गांधी चमन येथून हा मोर्चा सकाळी काढण्यात आला. गांधीचमन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रीकरण करून भाववाढ रोखणे, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाय योजना करणे, ग्रामीण आणि शहरी भागात किमान वेतन मिळेल अशी हमी देणे, कामगार कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे, सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार शिजविणा-या कर्मचा-यांना सरकारी नोकरीत घेऊन महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांचा समावेश होता. या मोर्चात अण्णा सावंत, मधुकर मोकळे, गोविंद आर्दड, साजेदा बेगम, कांता मिटकरी, मधुरा रत्नपारखे, हरिश्चंद्र लोखंडे, मंगल नरंगळे आदींसह अन्य कर्मचा-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Morchaमोर्चाSocialसामाजिक