शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनो, मैदानावर खेळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:21 IST

मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.अ. भा. साने गुरुजी कथामाला (जालना)च्या वतीने रविवारी येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात आयोजित दोनदिवसीय बालकुमार महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर साहित्यिक नरेंद्र लांजेवार, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. नारायण बोराडे, सुनील रायठठ्ठा, केशरसिंह बगेरिया, राधिका शेटे , जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, संतोष लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. महाजन म्हणाल्या की, हा बाल व्यक्तिमत्त्व घडविणारा महोत्सव आहे. माणसाने माणसाप्रमाणे वागावे हा संदेश साने गुरुजींनी दिला. साने गुरुजींचे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य जालना येथील अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने सुरू आहे. मोबाईलमुळे मुले एकलकोंडी होत असून, ब्ल्यू व्हेलसारख्या हिंसक खेळांमध्ये अडकत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुलांशी गोष्टींच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी मुलांना सकारात्मकतेने वागण्यासह स्वच्छतेचा संदेश दिला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी व स्व. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर नरेंद्र लांजेवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्व. बाबूराव जाफराबादकर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. भक्ती पवार हिने स्वागतगीत गायले. डॉ. सुहास सदाव्रते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विद्या दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर.जोशी यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रास विविध ठिकाणांहून आलेल्या साहित्यप्रेमी नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मुक्त संवाद कार्यक्रमबालकुमार महोत्सवात अध्यक्षा डॉ. छाया महाजन, उद्घाटक नरेंद्र लांजेवार, कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी बालकांशी मुक्त संवाद साधला. नरेंद्र लांजेवार यांनी मुलांना बोलते करुन त्यांच्या पालकांविषयीच्या भावना अभिनयातून समजावून घेतल्या. पुणे येथील कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी विनोदी कथा सांगून मुलांना खळखळून हसविले. डॉ. छाया महाजन यांना मुलांनी प्रश्न विचारुन त्यांच्यातील लेखिकेला बोलते केले.बालकुमारांचे कविसंमेलन रंगलेबालकुमार महोत्सवात ज्येष्ठ बालसाहित्यकार उद्धव भयवाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमारांचे कविसंमेलन चांगलेच रंगले. कविसंमेलनात अभिषेक बनकर, प्रणिता मेहेत्रे यांनी कवितेतून संदेश दिले. अंजली जुंबड या विद्यार्थिनीने ‘आई’ नावाची कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले.