शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

मुलांनो, मैदानावर खेळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:21 IST

मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.अ. भा. साने गुरुजी कथामाला (जालना)च्या वतीने रविवारी येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात आयोजित दोनदिवसीय बालकुमार महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर साहित्यिक नरेंद्र लांजेवार, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. नारायण बोराडे, सुनील रायठठ्ठा, केशरसिंह बगेरिया, राधिका शेटे , जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, संतोष लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. महाजन म्हणाल्या की, हा बाल व्यक्तिमत्त्व घडविणारा महोत्सव आहे. माणसाने माणसाप्रमाणे वागावे हा संदेश साने गुरुजींनी दिला. साने गुरुजींचे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य जालना येथील अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने सुरू आहे. मोबाईलमुळे मुले एकलकोंडी होत असून, ब्ल्यू व्हेलसारख्या हिंसक खेळांमध्ये अडकत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुलांशी गोष्टींच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी मुलांना सकारात्मकतेने वागण्यासह स्वच्छतेचा संदेश दिला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी व स्व. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर नरेंद्र लांजेवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्व. बाबूराव जाफराबादकर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. भक्ती पवार हिने स्वागतगीत गायले. डॉ. सुहास सदाव्रते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विद्या दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर.जोशी यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रास विविध ठिकाणांहून आलेल्या साहित्यप्रेमी नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मुक्त संवाद कार्यक्रमबालकुमार महोत्सवात अध्यक्षा डॉ. छाया महाजन, उद्घाटक नरेंद्र लांजेवार, कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी बालकांशी मुक्त संवाद साधला. नरेंद्र लांजेवार यांनी मुलांना बोलते करुन त्यांच्या पालकांविषयीच्या भावना अभिनयातून समजावून घेतल्या. पुणे येथील कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी विनोदी कथा सांगून मुलांना खळखळून हसविले. डॉ. छाया महाजन यांना मुलांनी प्रश्न विचारुन त्यांच्यातील लेखिकेला बोलते केले.बालकुमारांचे कविसंमेलन रंगलेबालकुमार महोत्सवात ज्येष्ठ बालसाहित्यकार उद्धव भयवाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमारांचे कविसंमेलन चांगलेच रंगले. कविसंमेलनात अभिषेक बनकर, प्रणिता मेहेत्रे यांनी कवितेतून संदेश दिले. अंजली जुंबड या विद्यार्थिनीने ‘आई’ नावाची कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले.