शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

कोरोना नियंत्रणासाठी स्वच्छता ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:33 IST

नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो स्वच्छतेचा त्यामुळे जालना पालिकेसह जिल्ह्यातील पालिका, जिल्हा परिषद तसेच एसटी महामंडळ, रेल्वे स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासह वैयक्तिक पातळीवरही नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी बुधवारी गायकवाड यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के.. राठोड यांनी प्रारंभी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी यापूर्वीच घेतली आहे. संशयितांची तपासणी करण्यासह वेळप्रसंगी त्यांना अन्य रूग्णांपासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक ते डॉक्टर तसेच औषधींचा साठाही मुबलक असल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांवर नजर ठेवणयसाठी आम्ही जाणीवजागृती केली आहे. एखाद्यास सर्दी, मोठ्या प्रमाणावर खोकला येऊन तो थांबत नसेल तर, अशा व्यक्तींनी तातडीने जवळच्या रूग्णालयात जावे अथवा जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊन आरोग्य तपासणी करण्याची सूचनाही दिल्याचे राठोड म्हणाले. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेततील मुलांचे हॉस्टेल हे ताब्यात घेतले असून, वेळप्रसंगी संशयितास त्या भागात ठेवण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.एकूणच या बैठकीत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी कचरा टाकताना तो घंटागाडीतच टाकण्याची सक्ती करण्यात आली असून,त्यासाठी घंटागाड्यांच्या फेरी वाढण्यिावरही चर्चा करण्यात आल्याचे निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या अधिका-यांनाही बस स्वच्छ ठेवण्यासह प्रवाशांना काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने हातरूमालाचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज चालक तसेच वाहकांनी प्रवाशांना आवर्जून सांगावी.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या तसेच प्रत्यक्ष गावातही स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी अधिकाधिक लक्ष देण्याचे सांगितले. उपमुख्याधिकारी लोंढे यांनी या बाबत जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांना तत्पर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.आढावा : घाबरून न जाण्याचे आवाहनकोरोना व्हायरस हा जास्त म्हणजेच २५ डिग्री सेल्सियसमध्ये जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, हा गैरसमज करून घेऊ नये. काळजी घेणे ही बाब नाकारून चालणार नाही. परंतु त्यामुळे भीती पसरेल असे कोणीही अफवा पसरवू नये असेही निर्देश यावेळी नागरिकांमध्ये द्यावेत, असे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोनाGovernmentसरकारHealth Tipsहेल्थ टिप्स