शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

सखी मतदान केंद्रामुळे महिलांना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:20 IST

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने नवीन पाऊल उचलले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने नवीन पाऊल उचलले. विधानसभा क्षेत्रनिहाय सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.जालना शहरात एक, भोकरदनमध्ये दोन, बदनापूरमध्ये एक, सिल्लोडमध्ये दोन, फुलंब्रीत दोन, पैठणमध्ये दोन सखी मतदान केंद्रे होती. जालना शहरातील सेंट मेंरी स्कूलमध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. यावेळी येथील महिलांशी संवाद साधाला असता, त्यांनी या सखी मतदान केंद्रामुळे महिलांना न्याय मिळाला असल्याचे सांगितले.या केंद्रामध्ये मतदानासंबंधी सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने केले. केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील महिला पोलिसांनीच पार पाडली. महिलांनी निर्भिडपणे मतदान केंद्रावर पोहोचून मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावा, हा या मागील उद्देश होता.आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेत महिलांना कधीच प्राधान्य मिळाले नाही; परंतु, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये प्रथमच सखी मतदान केंद्र उभारण्यात आल्याने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळाला, अशा प्रतिक्रिया सखी मतदान केंद्रात मतदान करण्यास आलेल्या महिला मतदारांनी व्यक्त केल्या.शासनाचा हा फारच छान उपक्रम आहे. यामुळे महिलांना मतदान करण्यास प्रोत्साहन मिळाले. एक चांगला उपक्रम राबविला. भविष्यातील निवडणुकांमध्ये देखील अशा प्रकारच्या व्यवस्था सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध झाल्यास निश्चितच मतदान करण्यास निरुत्साही असलेल्या नागरिकांना प्रोत्साहन मिळून मतदानाची आकडेवाडीचा आलेख उंचावला जाईल, असे शहरातील दीपाली चव्हाण यांनी सांगितले.भोकरदन : भोकरदन येथील न्यू हायस्कूलमधील बूथ क्रमांक १९३ मध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी सर्व महिला कर्मचारी कार्यरत होत्या. केंद्राध्यक्ष म्हणून रेजा बोडके, सविता जाधव, प्रीती दौड, सरिता भोकरे तसेच महिला पोलीस कर्मचारी संगीता मोकाशे यांच्या देखरेखीत दिवसभर सुरळीत मतदान पार पडले. सकाळी ७ वाजेपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी पहिल्या मतदाराचे औक्षण करून प्रत्येकाला गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे अशा प्रकारे स्वागत बघून मतदारांना देखील समाधान वाटले.या सखी केंद्राला महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.सखी मतदान केंद्रासाठी सजावट तसेच इतर व्यवस्था करण्यासाठी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. पोलिसांचेही यावेळी मोठी मदत झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाWomenमहिला