शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

वक्तृत्व स्पर्धेत जालना ते दिल्लीपर्यंतचा प्रवास - शिवानी शिरसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:10 IST

माझ्या राष्ट्रीय युवा संसद थेट दिल्लीपर्यंत या प्रवासामध्ये संघर्ष तर मला करावाच लागला; पण तो संघर्ष फक्त बुद्धिमत्तेचा होता.

जालना : माझं प्राथमिक शिक्षण हे जालना तालुक्यातील कुंभेफळ या गावी झालं. नंतर वडिलांनी जालना शहरातील ज्ञानज्योत महाविद्यालय येथे शिक्षणासाठी माझा प्रवेश निश्चित केला. सुरुवातीलाच सांगावसं वाटतं की, माझ्या राष्ट्रीय युवा संसद थेट दिल्लीपर्यंत या प्रवासामध्ये संघर्ष तर मला करावाच लागला; पण तो संघर्ष फक्त बुद्धिमत्तेचा होता.आर्थिक संघर्ष माझ्या नशिबात आलाच नाही. याचं एकमेव कारण ते माझे आई-वडील आहेत. माझ्या आजपर्यंतच्या यशाचे सर्व श्रेय त्यांना जाते. माझे वडील शेतकरी असूनही त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. मला वाचनाची आवड निर्माण झाली ती आमच्या घरी असणाऱ्या ग्रंथालयामुळे. गावाकडे वडिलांनी सार्वजनिक वाचनालय गावात सुरु केले. आणि त्याचा फायदा झाला तो मला. पुस्तके हेच मी जीवन समजू लागले. त्या ग्रंथालयातील थोर नेत्यांची आत्मचरित्र वाचू लागले. त्याचा परिणाम, माझ्या शालेय जीवनावर झाला. जिजाऊंचे संस्कार, स्वामी विवेकानंद यांचे अध्यात्मिक ज्ञान, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा दृढ विश्वास यामुळे माझ्यातल्या वक्तृत्वाने भरारी घ्यायला सुरुवात केली. फक्त वक्तृत्वच नाही तर मी शालेय जीवनात सुद्धा गुणवत्ताच्या यादीत स्थान मिळवलं ते वाचनाच्या सवयीमुळे. त्यानंतर विद्यालयामध्ये माझी वक्तृत्वाची मुळे खोलवर रुजली गेली. शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत आणि प्रत्येक नेत्याच्या जयंतीच्या भाषणांमध्ये मी सहभाग घेऊ लागले. त्यासाठी मला महत्त्वाची मदत मिळाली ती माझे काकाकडून त्यानंतर अकरावी व बारावीसाठी जालन्यातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात प्रवेश घेतला. स्वप्न होते डॉक्टर बनण्याचे ! दोन वर्ष मेहनत केली अभ्यास केला. पण कुठे तरी मी कमी पडले आणि मी मेडिकलला प्रवेश घेऊ शकले नाही.जेईएस महाविद्यालयामध्ये बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. या दरम्यानच मी वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. व त्यामध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही सहभाग घेतला. राष्ट्रीय युवा संसद जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग घेतला. यात मी प्रथम क्रमांक मिळावला. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय युवा संसदमध्ये सहभाग नोंदवून मी जिल्ह्याचे नेतृत्व केलं. यातून मी दिल्लीच्या राष्ट्रीय युवा संसदेसाठी पात्र झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. येथेही चांगला प्रयत्न केला. एक युवा म्हणून देशाच्या नेतृत्वासाठी या राष्ट्रीय संसदेत सहभाग नोंदवला आणि त्यातून एक राष्ट्रप्रेमाची भावना मनामध्ये जागृत झाली. मला सहकार्य केलेल्या सर्वाचे मी आभारी आहे. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा .- शब्दांकन : दीपक ढोले

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनdelhiदिल्लीcollegeमहाविद्यालय