शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वनीकरण विभागाचे घाणेवाडी येथील जांभूळबन कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:17 IST

सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने घाणेवाडी परिसरात जांभूळ आणि बांबू बन प्रस्तावित होते. जवळपास एक कोटी रुपये खर्चून बन तयार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने घाणेवाडी परिसरात जांभूळ आणि बांबू बन प्रस्तावित होते. जवळपास एक कोटी रुपये खर्चून बन तयार करण्यात आले. तेही कागदावरच असल्याचे उघडकीस आले असून, या संदर्भातील तक्रार सरपंच मीरा भागवत बावणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने घाणेवाडी, निधोना, नंदापूर, कडवंची आणि धारकल्याण आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत विविध वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे कागदावर दाखविण्यात आले. संबंधित ग्रामपंचायतींकडून ठराव घेऊन नाहरकत प्रमाणपत्र घेऊन जांभूळबन तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.गावातील जवळपास ७०० बेरोजगारांना रोजगार देण्याच्या अटीवरच वनीकरण विभागाला घाणेवाडी ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचे मीरा बावणे यांनी म्हटले आहे. असे असले तरी वनीकरण विभागाच्या वतीने सर्व कामे ही यंत्राद्वारे करण्यात आली. बेरोजगारांना कुठलेही काम देण्यात आले नाही. बोगस मस्टर बनवून मजुरांची आकडेवारी दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप बावणे यांनी निवेदनात केला आहे. वृक्ष लागवड, जांभूळबन, बांबूबन, बनावट हजेरीपट, जालना- भोकरदन मार्गावरील दुतर्फा वृक्ष लागवड, घाणेवाडी पाटी ते घाणेवाडी तलाव, घाणेवाडी तलाव ते निधोना मार्गावर वृक्ष लागवड, जांभूळ बनासाठी ड्रीप, जमीन सपाटीकरण आणि जांभूळबनासाठीच्या संरक्षक भिंत उभारणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सामाजिक वनीकरण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच मीरा भागवत बावणे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाची प्रत सामाजिक वनीकरण विभागाचे आयुक्त यांच्यासह जालना येथील सामाजिक वनीकरण कार्यालयास देण्यात आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागcollectorतहसीलदार