शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

श्रीराम लागूंच्या आठवणींना जालनेकरांनी दिला उजाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:46 IST

प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली.

लोकमत न्य्ाूज नेटवर्कजालना : प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली. डॉ. श्रीराम लागू हे तीन वेळेस जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी जेईएस महाविद्यालच्या स्नेहसंमलनास हजेरी लावण्यासह सामाजिक कृतज्ञता समग्र निधी जमा करण्यासाठी ते जालन्यात आल्याची आठवण चित्रपटप्रेमी आणि शायर अनुराग कपूर यांनी सांगितली.डॉ. श्रीराम लागू हे जालना येथील जेईएस महाविद्यालयात साधारपणे १९८७ मध्ये वार्षिक स्रेहसंमलनास आले होते. त्याच वेळी त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक सादर करून जालनेकर रसिकांना खिळवून ठेवले होते, अशी आठवण प्रा. संजय लकडे यांनी सांगितली. तसेच दुसºया एका कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू तसेच प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सदाशिव अमरापूरकर, अभिनेत्री तनुजा व अन्य कलाकार हे १९८५ मध्ये सामाजिक कृतज्ञता निधी जमा करण्यासाठी जालना दौºयावर आले होते. त्यावेळी कै.वसंत गोरंट्याल यांनी या सर्व कलावंतांच्या निवासाची व्यवस्था हॉटेल अंबरमध्ये केली होती. त्यावेळी अनुराग कपूर यांच्या नवचेतन युवा ग्रुपने देखील यात आपले योगदान दिल्याचे कपूर म्हणाले. आमच्या नवचेतन ग्रुपमध्ये २५ पेक्षा अधिक युवकांचा समावेश होता.ज्यावेळी लागू यांची भेट घेऊन आम्ही निधी जमा केला असताना त्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केल्याचे आजही आपल्याला चांगले आठवत असल्याचे कपूर म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत अनिल चोरडिया, सुनील चोरडिया, राजेश लखोटिया, जयेश पहाडे, आनंद लुणिया, गुरूदत्त यमूल आदींची उपस्थिती होती. दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमानिमित्त श्रीराम लागू आणि कै. नरेंद्र दाभोळकर हे जालन्यातील जैन इंग्रजी शाळेजवळील महावीर मंगल कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी देवाला रिटायर केलेच पाहिजे या बद्दल सांगितले होते. तसेच मूर्ती पूजा कशी चुकीची असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. रस्ता ओलांडताना एका लहान मुलाचा अपघात होतो, आणि तो देखील एका मंदिरासमोर झालेला असतो, जर देव असताच तर या मुलाचे प्राण तो का वाचवू शकला नाही असे सांगून त्यांनी देवांवर विश्वास ठेवणाऱ्यांना आव्हान दिल्याची आठवण त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले कृष्णा नायगव्हाणकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितली.

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूcultureसांस्कृतिकSocialसामाजिक