शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम लागूंच्या आठवणींना जालनेकरांनी दिला उजाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:46 IST

प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली.

लोकमत न्य्ाूज नेटवर्कजालना : प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली. डॉ. श्रीराम लागू हे तीन वेळेस जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी जेईएस महाविद्यालच्या स्नेहसंमलनास हजेरी लावण्यासह सामाजिक कृतज्ञता समग्र निधी जमा करण्यासाठी ते जालन्यात आल्याची आठवण चित्रपटप्रेमी आणि शायर अनुराग कपूर यांनी सांगितली.डॉ. श्रीराम लागू हे जालना येथील जेईएस महाविद्यालयात साधारपणे १९८७ मध्ये वार्षिक स्रेहसंमलनास आले होते. त्याच वेळी त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक सादर करून जालनेकर रसिकांना खिळवून ठेवले होते, अशी आठवण प्रा. संजय लकडे यांनी सांगितली. तसेच दुसºया एका कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू तसेच प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सदाशिव अमरापूरकर, अभिनेत्री तनुजा व अन्य कलाकार हे १९८५ मध्ये सामाजिक कृतज्ञता निधी जमा करण्यासाठी जालना दौºयावर आले होते. त्यावेळी कै.वसंत गोरंट्याल यांनी या सर्व कलावंतांच्या निवासाची व्यवस्था हॉटेल अंबरमध्ये केली होती. त्यावेळी अनुराग कपूर यांच्या नवचेतन युवा ग्रुपने देखील यात आपले योगदान दिल्याचे कपूर म्हणाले. आमच्या नवचेतन ग्रुपमध्ये २५ पेक्षा अधिक युवकांचा समावेश होता.ज्यावेळी लागू यांची भेट घेऊन आम्ही निधी जमा केला असताना त्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केल्याचे आजही आपल्याला चांगले आठवत असल्याचे कपूर म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत अनिल चोरडिया, सुनील चोरडिया, राजेश लखोटिया, जयेश पहाडे, आनंद लुणिया, गुरूदत्त यमूल आदींची उपस्थिती होती. दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमानिमित्त श्रीराम लागू आणि कै. नरेंद्र दाभोळकर हे जालन्यातील जैन इंग्रजी शाळेजवळील महावीर मंगल कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी देवाला रिटायर केलेच पाहिजे या बद्दल सांगितले होते. तसेच मूर्ती पूजा कशी चुकीची असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. रस्ता ओलांडताना एका लहान मुलाचा अपघात होतो, आणि तो देखील एका मंदिरासमोर झालेला असतो, जर देव असताच तर या मुलाचे प्राण तो का वाचवू शकला नाही असे सांगून त्यांनी देवांवर विश्वास ठेवणाऱ्यांना आव्हान दिल्याची आठवण त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले कृष्णा नायगव्हाणकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितली.

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूcultureसांस्कृतिकSocialसामाजिक