शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

जालन्याच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:42 AM

जालना लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अनेक दावे, प्रतिदावे भाजप, काँग्रेसकडून केले जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अनेक दावे, प्रतिदावे भाजप, काँग्रेसकडून केले जात होते.भाजपकडून रावसाहेब दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून विलास औताडे यांच्यात थेट लढत झाली. वंचित आघाडीचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या दोन सभा डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्यासाठी झाल्याने निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या स्वार्थाप्रमाणे निवडणुकीचे अंदाज बांधतांना दिसून आले. भाजपच्या गोटात तर यंदाही दानवे यांचा विजय हा अडीच लाख मताधिक्यापेक्षा अधिक मताने होईल, असे दावे केले जात आहेत. परंतु पैठण, फुलंब्री, जालना शहरातील मतदान दानवेंसाठी कुठला संदेश घेऊन येतो ते गुरुवारी स्पष्ट होणार आहे.शेतकरी विरोधी वक्तव्य तसेच दुष्काळ आणि कर्जमाफीचे मृगजळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा रोष मतपेटीतून व्यक्त होतो की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. औताडे यांनी यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा अधिकचे परिश्रम घेऊन रण तापवले. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात उडी घेतली होती. जनता नेमकी कोणाच्या पाठीशी आहे, याची उत्सुकता आता केवळ काही तासांवर येऊन ठेपली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार आहे.कडेकोट बंदोबस्त, ४८४ पोलीस तैनातजालना : लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची गुुरुवारी औरंगाबाद मार्गावरील एका बंद असलेल्या गुटखा कंपनीच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे. मतमोजणी दरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहेनिकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील प्रमुख चौक, प्रमुख उमेदवार आणि राजकीय पक्ष कार्यालयाबाहेरही पोलीस तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली. जालना लोकसभा मतदान २३ एप्रिल रोजी झाले. तब्बल एक महिन्यानंतर २३ मे रोजी जालना औरंगाबाद मार्गावर असलेल्या संकेत फूड या कंपनीत मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत अनेक मत मतांतरे निर्माण झाली होती. आपणच बाजी मारणार, असा दावा प्रत्येक प्रमुख उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यातून एक चढाओढीचे वातावरण तयार झालेले आहे. एकंदरीत मतमोजणीच्या आधी येत असलेल्या एक्झिट पोलवरुन तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मतमोजणीसाठी उमेदवार मतदान प्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे हजारो कार्यकर्ते मतमोजणीस्थळी जमा होतील. मतमोजणीस्थळी तीन उपविभागीय पोलीस अधिकारी १४ पोलीस निरीक्षक, ३७ पोलीस उपनिरीक्षक, ३१९ कॉन्स्टेबल, २४ महिला पोलीस कर्मचारी, सीआरपीएमची कंपनी असा तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. या शिवाय शहरातील प्रमुख चौक, तसेच संवेदनशील भागात पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?जालना : जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. ही मतमोजणी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीत होणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पूर्ण केली असून, निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.८४ टेबलवरून होणार मतमोजणीजालना लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी प्रत्येकी एकूण ८४ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या ठिकाणी एक पर्यवेक्षक, एक सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एका टेबलमागे तीन कर्मचारी तैनात करण्यात आले असून, ईव्हीएम मशीन आणून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे.२६ फेऱ्यांची शक्यताजालना लोकसभेच्या मतमोजणीसाठी २५ मतमोजणीच्या फे-या होण्याची शक्यता असून, प्रारंभी २४ फेºया होतील, असा अंदाज होता. परंतु दोन फे-यांची वाढ झाली आहे. प्रारंभी ईव्हीएम मशीनची मोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी होणार आहे.असे असेल मनुष्यबळमतमोजणीसाठी एकूण ८०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पर्यवेक्षक आणि उपजिल्हाधिकारी यांची कडक नजर राहणार आहे. निकाल गतीने लागावेत म्हणून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल देण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालjalna-pcजालना