शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जालना पालिका @ १०२ ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:02 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे. आम्हाला पहिल्या शंभरमध्ये येण्यासाठीचे प्रयत्न होते, मात्र ते शक्य झाले नाही. असे असले तरी आमची ही प्रगती देखील आम्हांला नवीन ऊर्जा देणारी असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली.जालना शहर स्वच्छतेसाठी आज घडीला ५२ घंटागाड्या असून, पालिकेचे ३०० तर खाजगी तत्त्वावर २०० मजुरांना सोबत घेऊन शहरातील सर्व रस्ते दररोज साफ केले जातात. यासाठी १८ ट्रॅक्टर असून, वैयक्तिक शौचालये बांधण्यावरही भर दिला जात आहे. जालन्यातील घनकचरा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आमचे ४०० गुण कमी झाल्याची खंत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली. दरम्यान, सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प आता नव्याने पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रूपयांचे टेंडर काढले असून, हे काम येत्या सहा महिन्यांत मार्गी लागणार आहे.शहरातील कचरा उलचलून सारवाडी मार्गवरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो, तो यापुढे तेथे न टाकता ते ग्राऊंड पूर्ण स्वच्छ करून तेथे बाग उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत.आता जालनेकरांना स्वच्छतेसाठी दररोज सर्व प्रभागांत जिंगल बेल असलेली घंटागाडी दोनवेळेस फिरवली जात आहे, त्यामुळे शहरातील रस्ते, चौकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे.आता या घंटागाडीला महिलांच्या सुविधेसाठी सॅनेटरी नॅपकिन तसेच लहान मुलांचे डायपर टाकण्यासाठी स्वतंत्र लालडबा बसवण्यात येणार आहे. सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावताना महिलांची मोठी मुस्कटदाबी होते, ती यापुढे होणार नाही.जालना : राज्य अमृतमध्ये ३० व्या स्थानी४केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अर्थात अमृत योजनेत देशातील एक लाख लोकसंख्या असलेल्या ४२५ नगर पालिकांनी सहभाग घेतला होता. त्यात जालना नगर पालिका ही १०२ व्या स्थानावर आहे. तर राज्य सरकारच्या अमृत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ४५ नगर पालिकांचा सहभाग होता, त्यात जालन्याने ३० वा क्रमांक मिळविला आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जशी प्रशसनाची जबाबदारी आहे, तशीच ती जालन्यातील नागरिकांचीही आहे. त्यामुळे सर्वांनी मानसिकता बदलून एकत्रित येऊन शहर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा, जालना

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद