शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जालना पालिका @ १०२ ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:02 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे. आम्हाला पहिल्या शंभरमध्ये येण्यासाठीचे प्रयत्न होते, मात्र ते शक्य झाले नाही. असे असले तरी आमची ही प्रगती देखील आम्हांला नवीन ऊर्जा देणारी असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली.जालना शहर स्वच्छतेसाठी आज घडीला ५२ घंटागाड्या असून, पालिकेचे ३०० तर खाजगी तत्त्वावर २०० मजुरांना सोबत घेऊन शहरातील सर्व रस्ते दररोज साफ केले जातात. यासाठी १८ ट्रॅक्टर असून, वैयक्तिक शौचालये बांधण्यावरही भर दिला जात आहे. जालन्यातील घनकचरा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आमचे ४०० गुण कमी झाल्याची खंत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली. दरम्यान, सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प आता नव्याने पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रूपयांचे टेंडर काढले असून, हे काम येत्या सहा महिन्यांत मार्गी लागणार आहे.शहरातील कचरा उलचलून सारवाडी मार्गवरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो, तो यापुढे तेथे न टाकता ते ग्राऊंड पूर्ण स्वच्छ करून तेथे बाग उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत.आता जालनेकरांना स्वच्छतेसाठी दररोज सर्व प्रभागांत जिंगल बेल असलेली घंटागाडी दोनवेळेस फिरवली जात आहे, त्यामुळे शहरातील रस्ते, चौकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे.आता या घंटागाडीला महिलांच्या सुविधेसाठी सॅनेटरी नॅपकिन तसेच लहान मुलांचे डायपर टाकण्यासाठी स्वतंत्र लालडबा बसवण्यात येणार आहे. सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावताना महिलांची मोठी मुस्कटदाबी होते, ती यापुढे होणार नाही.जालना : राज्य अमृतमध्ये ३० व्या स्थानी४केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अर्थात अमृत योजनेत देशातील एक लाख लोकसंख्या असलेल्या ४२५ नगर पालिकांनी सहभाग घेतला होता. त्यात जालना नगर पालिका ही १०२ व्या स्थानावर आहे. तर राज्य सरकारच्या अमृत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ४५ नगर पालिकांचा सहभाग होता, त्यात जालन्याने ३० वा क्रमांक मिळविला आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जशी प्रशसनाची जबाबदारी आहे, तशीच ती जालन्यातील नागरिकांचीही आहे. त्यामुळे सर्वांनी मानसिकता बदलून एकत्रित येऊन शहर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा, जालना

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद