शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जालना पालिका @ १०२ ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:02 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे. आम्हाला पहिल्या शंभरमध्ये येण्यासाठीचे प्रयत्न होते, मात्र ते शक्य झाले नाही. असे असले तरी आमची ही प्रगती देखील आम्हांला नवीन ऊर्जा देणारी असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली.जालना शहर स्वच्छतेसाठी आज घडीला ५२ घंटागाड्या असून, पालिकेचे ३०० तर खाजगी तत्त्वावर २०० मजुरांना सोबत घेऊन शहरातील सर्व रस्ते दररोज साफ केले जातात. यासाठी १८ ट्रॅक्टर असून, वैयक्तिक शौचालये बांधण्यावरही भर दिला जात आहे. जालन्यातील घनकचरा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आमचे ४०० गुण कमी झाल्याची खंत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली. दरम्यान, सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प आता नव्याने पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रूपयांचे टेंडर काढले असून, हे काम येत्या सहा महिन्यांत मार्गी लागणार आहे.शहरातील कचरा उलचलून सारवाडी मार्गवरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो, तो यापुढे तेथे न टाकता ते ग्राऊंड पूर्ण स्वच्छ करून तेथे बाग उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत.आता जालनेकरांना स्वच्छतेसाठी दररोज सर्व प्रभागांत जिंगल बेल असलेली घंटागाडी दोनवेळेस फिरवली जात आहे, त्यामुळे शहरातील रस्ते, चौकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे.आता या घंटागाडीला महिलांच्या सुविधेसाठी सॅनेटरी नॅपकिन तसेच लहान मुलांचे डायपर टाकण्यासाठी स्वतंत्र लालडबा बसवण्यात येणार आहे. सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावताना महिलांची मोठी मुस्कटदाबी होते, ती यापुढे होणार नाही.जालना : राज्य अमृतमध्ये ३० व्या स्थानी४केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अर्थात अमृत योजनेत देशातील एक लाख लोकसंख्या असलेल्या ४२५ नगर पालिकांनी सहभाग घेतला होता. त्यात जालना नगर पालिका ही १०२ व्या स्थानावर आहे. तर राज्य सरकारच्या अमृत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ४५ नगर पालिकांचा सहभाग होता, त्यात जालन्याने ३० वा क्रमांक मिळविला आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जशी प्रशसनाची जबाबदारी आहे, तशीच ती जालन्यातील नागरिकांचीही आहे. त्यामुळे सर्वांनी मानसिकता बदलून एकत्रित येऊन शहर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा, जालना

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद