शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जालना बाजारपेठ समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

(संजय लव्हाडे) जालना : ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, बहुतांश वस्तुमालांच्या दरांमध्ये मंदी आली आहे. मे महिन्यासाठी ...

(संजय लव्हाडे)

जालना : ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, बहुतांश वस्तुमालांच्या दरांमध्ये मंदी आली आहे. मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख टन इतका जाहीर झाला असून, यामुळे साखरेचे दर आटोक्यात राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंब्याची विक्री मात्र चांगली होताना दिसत आहे.

देशभरातील लाॅकडाऊनमुळे बाजारपेठेत ग्राहकांची गैरहजेरी जाणवत आहे. त्यामुळे माल प्रचंड प्रमाणात असूनही उलाढाल होत नसल्याने व्यापारी परेशान झाले. सर्व प्रकारच्या तेलांच्या दरात लागोपाठ सुरू असलेल्या तेजीला सरत्या आठवड्यात ब्रेक लागला. मात्र, दरातील ही मंदी अल्प काळासाठीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर भडकलेलेच आहेत. वायदा बाजारामुळे तेलाचे दर किंचित कमी-जास्त होत असले, तरी मोठा फरक पडण्याची शक्यता नाही. पाम तेलाचे दर १४,०००, सूर्यफूल तेल १७,५००, सरकी तेल १५,०००, सोयाबीन १४,७०० आणि करडी तेलाचे दर १८,००० ते १८,५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. वनस्पती तुपाचे दर १,७०० ते २,००० रुपये प्रति डबा असे आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाने डाळींच्या आयात कोट्याला स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रात डाळींची आयात थोडी उशिराने होण्याची शक्यता आहे. सध्या हाॅटेल्स बंद असून, लग्न समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असून, डाळींची मागणी कमी झाली आहे. डाळींच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची मंदी आली. हरभरा डाळीचे दर ६,३०० ते ६,५००, तूरडाळ ९,१०० ते १०,२००, मूगडाळ ९,००० ते ९,८००, मसूर डाळ ७,५०० ते ८,००० आणि उडद डाळीचे दर ९,००० ते १०,००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख टन इतका जाहीर झाला आहे. उन्हाळ्यात सहसा साखरेला मोठी मागणी असते, परंतु लाॅकडाऊनमुळे सध्या साखरेला म्हणावी तशी मागणी नाही. त्यामुळे साखरेच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन बंद झाले आहे. चालू हंगामात केवळ महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १५० लाख टन इतके झाले. हे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. मात्र, मागणी अभावानेच बहुतांश कारखाने साखरेची विक्री न्यूनतम निर्धारित मूल्यापेक्षा कमी दराने करत आहेत. सध्या साखरेचे दर ३,२८० ते ३,४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात सध्या किंचित मंदी असली, तरी ती अल्प काळासाठी असून, पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या खरेदी विक्रीवर सटोरियांची पकड मजबूत आहे. लाॅकडाऊनमुळे सोन्या-चांदीची विक्री सध्या कमी असली, तरी भविष्यात मंदी येण्याची शक्यता नाही. सध्या सोन्याचे दर ४९,००० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर ७१,००० रुपये प्रति किलो असे आहेत. गव्हाचे दर १,७०० ते २,५०० रुपये प्रति क्विंटल, ज्वारी १,३६० ते ३,४००, बाजरी १,२६० ते १,४००, तूर ६,३०० ते ६,७००, मका १,३०० ते १,५५०, सोयाबीन ६,५०० ते ६,७०० आणि हरभरा ४,९०० ते ५,१०० रुपये प्रति क्विंटल असे दर आहेत.

Zoomed into item.