शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारपेठ समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

(संजय लव्हाडे) जालना : ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, बहुतांश वस्तुमालांच्या दरांमध्ये मंदी आली आहे. मे महिन्यासाठी ...

(संजय लव्हाडे)

जालना : ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, बहुतांश वस्तुमालांच्या दरांमध्ये मंदी आली आहे. मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख टन इतका जाहीर झाला असून, यामुळे साखरेचे दर आटोक्यात राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंब्याची विक्री मात्र चांगली होताना दिसत आहे.

देशभरातील लाॅकडाऊनमुळे बाजारपेठेत ग्राहकांची गैरहजेरी जाणवत आहे. त्यामुळे माल प्रचंड प्रमाणात असूनही उलाढाल होत नसल्याने व्यापारी परेशान झाले. सर्व प्रकारच्या तेलांच्या दरात लागोपाठ सुरू असलेल्या तेजीला सरत्या आठवड्यात ब्रेक लागला. मात्र, दरातील ही मंदी अल्प काळासाठीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर भडकलेलेच आहेत. वायदा बाजारामुळे तेलाचे दर किंचित कमी-जास्त होत असले, तरी मोठा फरक पडण्याची शक्यता नाही. पाम तेलाचे दर १४,०००, सूर्यफूल तेल १७,५००, सरकी तेल १५,०००, सोयाबीन १४,७०० आणि करडी तेलाचे दर १८,००० ते १८,५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. वनस्पती तुपाचे दर १,७०० ते २,००० रुपये प्रति डबा असे आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाने डाळींच्या आयात कोट्याला स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रात डाळींची आयात थोडी उशिराने होण्याची शक्यता आहे. सध्या हाॅटेल्स बंद असून, लग्न समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असून, डाळींची मागणी कमी झाली आहे. डाळींच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची मंदी आली. हरभरा डाळीचे दर ६,३०० ते ६,५००, तूरडाळ ९,१०० ते १०,२००, मूगडाळ ९,००० ते ९,८००, मसूर डाळ ७,५०० ते ८,००० आणि उडद डाळीचे दर ९,००० ते १०,००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख टन इतका जाहीर झाला आहे. उन्हाळ्यात सहसा साखरेला मोठी मागणी असते, परंतु लाॅकडाऊनमुळे सध्या साखरेला म्हणावी तशी मागणी नाही. त्यामुळे साखरेच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन बंद झाले आहे. चालू हंगामात केवळ महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १५० लाख टन इतके झाले. हे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. मात्र, मागणी अभावानेच बहुतांश कारखाने साखरेची विक्री न्यूनतम निर्धारित मूल्यापेक्षा कमी दराने करत आहेत. सध्या साखरेचे दर ३,२८० ते ३,४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात सध्या किंचित मंदी असली, तरी ती अल्प काळासाठी असून, पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या खरेदी विक्रीवर सटोरियांची पकड मजबूत आहे. लाॅकडाऊनमुळे सोन्या-चांदीची विक्री सध्या कमी असली, तरी भविष्यात मंदी येण्याची शक्यता नाही. सध्या सोन्याचे दर ४९,००० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर ७१,००० रुपये प्रति किलो असे आहेत. गव्हाचे दर १,७०० ते २,५०० रुपये प्रति क्विंटल, ज्वारी १,३६० ते ३,४००, बाजरी १,२६० ते १,४००, तूर ६,३०० ते ६,७००, मका १,३०० ते १,५५०, सोयाबीन ६,५०० ते ६,७०० आणि हरभरा ४,९०० ते ५,१०० रुपये प्रति क्विंटल असे दर आहेत.

Zoomed into item.