शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

जालना बाजार समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

(संजय लव्हाडे) जालना : अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मोसंबी, डाळिंब, ...

(संजय लव्हाडे)

जालना : अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, टरबूज, आंबे यांना फटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ग्राहकी अत्यल्प आहे. सटोडियांमुळे सर्व प्रकारचे खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे.

नवीन हरभरा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये येत असल्यामुळे हरभऱ्याची विक्री नाफेडने तूर्त बंद केली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तात्पुरती मंदी येऊ शकते. मात्र, नंतर यात तेजीची शक्यता नाकारता येणार नाही. जालना बाजारपेठेत हरभऱ्याची दररोज ४ हजार पोती आवक होत असून, १०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ४४०० ते ४६२५ रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

सध्या जागतिक बाजारपेठेत सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, सरसो तेल आणि पामतेलाच्या दरात विक्रमी तेजी आहे. मागील २-३ दिवसांत सर्व प्रकारच्या तेलांमध्ये मंदी आलेली दिसत होती. कमी भावात आलेले तेल विक्री करण्यावर सटोडियांचा जोर होता. त्यामुळे तेलांत मंदी आली होती. आता विक्री पूर्ण झाल्यानंतर सटोडियांनी तेलाची खरेदी केली असून तेलांवर आपली पकड पुन्हा मजबूत केली आहे. त्यामुळे तेलांच्या दरात सोमवारी पुन्हा तेजी येण्याची दाट शक्यता आहे.

सध्या तेलबियांचा अधिकाधिक वापर हा बायोडिझेल तयार करण्यासाठी होत असल्यामुळे खाद्यतेलासाठी तेलबियांची टंचाई जाणवत आहे आणि त्यामुळेच खाद्यतेलांचे दर आकाशाला भिडले आहेत, असे मत एका जाणकाराने व्यक्त केले. सध्या सोयाबीन तेल १३४००, सरकी तेल १३५००, पामतेल १३०००, सूर्यफूल तेल १८०००, शेंगदाणा तेल १५६०० आणि करडी तेलाचे दर १७५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

यावर्षी भारतात तुरीचे उत्पादन कमी असून, सणासुदीच्या दिवसांमध्ये तुरीला मोठी मागणी आहे. त्यामुळे मोजांबिक देशातून २ लाख टन तूर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ही तूर येण्यास ३ ते ४ महिने लागतील. म्हणजे मोजांबिकमधील तूर भारतीय बाजारपेठेत जुलै महिन्यात येऊ शकते. तोपर्यंत तुरीचे दर हे वधारलेलेच राहतील. सध्या जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज ३०० पोती होत असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ६४०० ते ६७५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

चौकट

यंदा गाठ्यांची बाजारपेठ थंडावलेलीच

येत्या २८ तारखेला होळीचा सण आहे. होळीनिमित्त साखरेच्या गाठ्या जालना बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाठ्या अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. भाव ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

---------------------------

सोने, चांदीच्या दरात ५०० रुपयांची तेजी आली असून, सोने ४६८०० रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर ६९५०० रुपये प्रति किलो असे आहेत. पुढील महिन्यात लग्नसराई असल्यामुळे सोने, चांदीच्या दरात तेजी येईल, असे सराफांना वाटते.

गव्हाचे दर १६५० ते २३००, ज्वारी १४०० ते ३५००, बाजरी १२०० ते १५००, सोयाबीन ५३०० ते ५४००, उडीद ४००० ते ६५००, काबुली चना ४४०० ते ७४००, मूग ४००० ते ६५००, गूळ २५०० ते ३१००, साखर ३२५० ते ३४००, हरभरा डाळ २८०० ते ६०००, तूर डाळ ९००० ते १००००, मूग डाळ ८००० ते १००००, उडीद डाळ ८५०० ते १०५००, मसूर डाळ ६००० ते ७०००, शेंगदाणा ८५०० ते १०५०० आणि साबुदाण्याचे दर ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.