शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजार समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

(संजय लव्हाडे) जालना : अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मोसंबी, डाळिंब, ...

(संजय लव्हाडे)

जालना : अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, टरबूज, आंबे यांना फटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ग्राहकी अत्यल्प आहे. सटोडियांमुळे सर्व प्रकारचे खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे.

नवीन हरभरा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये येत असल्यामुळे हरभऱ्याची विक्री नाफेडने तूर्त बंद केली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तात्पुरती मंदी येऊ शकते. मात्र, नंतर यात तेजीची शक्यता नाकारता येणार नाही. जालना बाजारपेठेत हरभऱ्याची दररोज ४ हजार पोती आवक होत असून, १०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ४४०० ते ४६२५ रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

सध्या जागतिक बाजारपेठेत सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, सरसो तेल आणि पामतेलाच्या दरात विक्रमी तेजी आहे. मागील २-३ दिवसांत सर्व प्रकारच्या तेलांमध्ये मंदी आलेली दिसत होती. कमी भावात आलेले तेल विक्री करण्यावर सटोडियांचा जोर होता. त्यामुळे तेलांत मंदी आली होती. आता विक्री पूर्ण झाल्यानंतर सटोडियांनी तेलाची खरेदी केली असून तेलांवर आपली पकड पुन्हा मजबूत केली आहे. त्यामुळे तेलांच्या दरात सोमवारी पुन्हा तेजी येण्याची दाट शक्यता आहे.

सध्या तेलबियांचा अधिकाधिक वापर हा बायोडिझेल तयार करण्यासाठी होत असल्यामुळे खाद्यतेलासाठी तेलबियांची टंचाई जाणवत आहे आणि त्यामुळेच खाद्यतेलांचे दर आकाशाला भिडले आहेत, असे मत एका जाणकाराने व्यक्त केले. सध्या सोयाबीन तेल १३४००, सरकी तेल १३५००, पामतेल १३०००, सूर्यफूल तेल १८०००, शेंगदाणा तेल १५६०० आणि करडी तेलाचे दर १७५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

यावर्षी भारतात तुरीचे उत्पादन कमी असून, सणासुदीच्या दिवसांमध्ये तुरीला मोठी मागणी आहे. त्यामुळे मोजांबिक देशातून २ लाख टन तूर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ही तूर येण्यास ३ ते ४ महिने लागतील. म्हणजे मोजांबिकमधील तूर भारतीय बाजारपेठेत जुलै महिन्यात येऊ शकते. तोपर्यंत तुरीचे दर हे वधारलेलेच राहतील. सध्या जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज ३०० पोती होत असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ६४०० ते ६७५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

चौकट

यंदा गाठ्यांची बाजारपेठ थंडावलेलीच

येत्या २८ तारखेला होळीचा सण आहे. होळीनिमित्त साखरेच्या गाठ्या जालना बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाठ्या अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. भाव ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

---------------------------

सोने, चांदीच्या दरात ५०० रुपयांची तेजी आली असून, सोने ४६८०० रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर ६९५०० रुपये प्रति किलो असे आहेत. पुढील महिन्यात लग्नसराई असल्यामुळे सोने, चांदीच्या दरात तेजी येईल, असे सराफांना वाटते.

गव्हाचे दर १६५० ते २३००, ज्वारी १४०० ते ३५००, बाजरी १२०० ते १५००, सोयाबीन ५३०० ते ५४००, उडीद ४००० ते ६५००, काबुली चना ४४०० ते ७४००, मूग ४००० ते ६५००, गूळ २५०० ते ३१००, साखर ३२५० ते ३४००, हरभरा डाळ २८०० ते ६०००, तूर डाळ ९००० ते १००००, मूग डाळ ८००० ते १००००, उडीद डाळ ८५०० ते १०५००, मसूर डाळ ६००० ते ७०००, शेंगदाणा ८५०० ते १०५०० आणि साबुदाण्याचे दर ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.