शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जालना बनणार गुंतवणुकीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:01 IST

आगामी काळात जालना हे गुंतवणुकीचे केंद्र बनणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सागरमाला प्रकल्पांतर्गत जालना-औरंगाबाद रस्ता सहापदरी होणार आहे. समृद्धी महामार्गही शहराजवळून जात आहे. त्यामुळे नाशिक औद्योगिक वसाहतीप्रमाणे जालन्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांकडून गोदामांसाठी जागेची मागणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात जालना हे गुंतवणुकीचे केंद्र बनणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे केला.डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या योग भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी. आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर, उदय वाणी, सिद्धीविनाक मुळे, अशोक पांगारकर, उद्योजक घनशाम गोयल, किशोर अग्रवाल, राजेश सोनी, कैलास लोया, सुधाकर निकाळजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.खा. दानवे म्हणाले, की दोन महिन्यांपूर्वी रामदेव बाबा यांनी येथील योग शिबिराच्या समारोपात जालन्यात योग भवन बांधावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जालना-चिखली मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. चार मे रोजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाने उदघाटन होणार आहे. सिडका प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी नुकतीचे मंजुरी दिल्याचे खा. दानवे यांनी सांगितले. जिल्ह्यात सहा हजार कोटींची रस्ते काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर असून, अन्य पायाभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी दिला आहे. या पुढेही विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. योग भवनात पतंजली योगपीठाच्या माध्यमातून मोफत योग प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील, असे पाडळकर यांनी सांगितले. योग भवनात शेतक-यांनाही मार्गदर्शनाची सुविधा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण यांची या वेळी समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमास नगरसेवक विशाल बनकर, विजय पांगारकर, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, ज्ञानेश्वर ढोबळे, जीवन सले, शांतीबाई राठी, संध्या देठे, स्वाती जाधव, प्रशांत वाढेकर, डॉ. जगन्नाथ खंडागळे, डॉ. श्रीमंत मिसाळ, धन्नू काबलिये, भागवत बावणे, किशन डागा, योगेश लहाने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले.जालना : राज्यातील पहिले योग भवनजालनेकरांच्या आरोग्यासाठी तातडीने पाठपुरावा करत विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंर्तत पाच कोटी रुपये खर्चाचे राज्यातील पहिले योग भवन बांधण्यात येत आहे. जालना शहरातील सर्व मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणाची कामेही सुरू आहेत. जालना-वडीगोद्री रस्त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसाय