शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:51 IST

जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देटँकरवरच भिस्त : पिण्यापुरतेही पाणी मिळेना, सर्वात मोठा फटका स्टील उद्योगाला, एमआयडीसीने लक्ष घालावे

जालना : जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे. जालना येथील एमआयडीसीसाठी शेंद्रा येथून स्वतंत्र पाईपलाईन टाकली असून, त्यातून सहा एमएलडी सोडाच परंतु एक एमएलडीही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.जालना शहरातील सर्वात मोठा उद्योग म्हणून स्टीलकडे पाहिले जाते. अत्यंत उच्च वीज दाबावर स्टीलचे उत्पादन होते. हे झालेले उत्पादन लगेच थंड करण्यासाठी या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. परंतु गेल्या काही वर्षापासून या भागात पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेकांनी स्वत:चे पाणी पुनर्वापर प्लांट उभारले असून, काही उद्योजकांनी शेततळे तसेच विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या माध्यमातूनच सध्या उद्योग सुरू असल्याने येत्या काही दिवसात स्टील उद्योजकांवर उत्पादन कपातीची वेळ येणार आहे.जालना येथे स्टीलचे जवळपास सात मोठे प्लांट सुरू असून, त्यांना दररोज लाखो लिटर पाणी लागते. या स्टील उद्योगांचे पुरक उद्योग म्हणजे रोलिंगमिल असून, त्यांनाही तेवढेच पाणी लागत असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. जालना येथील एमआयडीसीकडून जालन्यातील उद्योगांना पुरेसास पाणीपुरवठा व्हावा यासाठी शेंद्रा येथून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. मात्र, तेथून कधीच पूर्ण क्षमतेने पाणी आलेले नाही. आता उद्योगांसाठी पुन्हा एकदा नव्याने ३०० कोटी रूपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असून, पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा येथील एमआयडीसीत हे पाणी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. परंतू हे नियोजन गेल्या काही वर्षापासून कासव गतीने सुरू आहे.जिल्ह्याला : ३०० टँकरद्वारे पाणीजालना जिल्ह्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. याचा परिणाम टँकरच्या फेऱ्या वाढीवर झाला असून, १५ मार्च पर्यंत जिल्ह्यात ३०१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अद्याप आठही तालुक्यांमधील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. एकूणच यंदाच्या उन्हाळ्यामध्ये टँकरची संख्या ही पाचशेपेक्षा अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यामध्ये केवळ १५४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. यामुळे यंदा टँकरवर लाखो रुपयांचा खर्च होणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसीwater shortageपाणीटंचाई