शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

जालना जिल्ह्यात गुटखाजन्य पदार्थविक्रीला आळा बसेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:06 IST

शहरात सर्रासपणे गुटखाजन्य पदार्थाची विक्री सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात सर्रासपणे गुटखाजन्य पदार्थाची विक्री सुरू आहे. दुकानदारांनी गुटखाजन्य पदार्थाची विक्री करत असल्याचे आढळून आल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करण्याच्या आदेश अन्न सुरक्षा आयुक्तांचे आहेत. मात्र याची शहरात म्हणावी तशी अद्यापही अंमलबजावणी होत नसून सर्रासपणे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लघन करण्यात येत आहे. मात्र याकडे अन्न आणि औषधी प्रशासनाचे सुध्दा दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात अनेक छोटे दुकानदार टपऱ्यामध्ये तंबाखूसोबतच चॉकलेट चिप्स, टॉफी, बिस्कीट, शीतपेय आदीची विक्री केली जात आहे.अशा ठिकाणी लहान मुलेही चॉकलेट, चिप्स आदीचे सेवन करतात. अशा प्रकारे गुटखाजन्य पदार्थाची विक्री केल्यास लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे अशा ठिकाणी गुटखाजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास अशा दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आदेश अन्न सुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिले आहेत. मात्र जिल्ह्यात आत्तापर्यत एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे अन्न औषधी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात २ हजार ८०० व्यापा-यांनी अन्न औषधी प्रशासन विभागाकडून परवाने काढले आहेत. त्याव्यतिरिक्त १३ हजार ५१५ छोट्या व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे.गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गुटख्यासह सुगंधी तंबाखूची विक्री राजरोसपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे पानटपरी धारकच नाही तर अन्न पदार्थ विक्री करणारे मोठे दुकानदारही गुटखा विक्री करीत असल्याचे चित्र आहे.यामुळे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लघन, आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता राज्य अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्त दराडे यांनी आदेश काढून ज्या ठिकाणी अन्न पदार्थाची विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असेल अशा दुकानदारावर कडक कारवाई करावी वेळ पडल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा अन्न सुरक्षा विभागाला दिले आहेत. असे असताना जिल्ह्यात कारवाईकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे चित्र आहे.उत्पादनावरच कारवाईची मागणीएकीकडे गुटखाबंदी केली जात असतानाच ती फोल ठरली आहे. त्यामुळे गुटख्याच्या विक्रीपेक्षा उत्पादन करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाState Governmentराज्य सरकार