शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात गुटखाजन्य पदार्थविक्रीला आळा बसेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:06 IST

शहरात सर्रासपणे गुटखाजन्य पदार्थाची विक्री सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात सर्रासपणे गुटखाजन्य पदार्थाची विक्री सुरू आहे. दुकानदारांनी गुटखाजन्य पदार्थाची विक्री करत असल्याचे आढळून आल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करण्याच्या आदेश अन्न सुरक्षा आयुक्तांचे आहेत. मात्र याची शहरात म्हणावी तशी अद्यापही अंमलबजावणी होत नसून सर्रासपणे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लघन करण्यात येत आहे. मात्र याकडे अन्न आणि औषधी प्रशासनाचे सुध्दा दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात अनेक छोटे दुकानदार टपऱ्यामध्ये तंबाखूसोबतच चॉकलेट चिप्स, टॉफी, बिस्कीट, शीतपेय आदीची विक्री केली जात आहे.अशा ठिकाणी लहान मुलेही चॉकलेट, चिप्स आदीचे सेवन करतात. अशा प्रकारे गुटखाजन्य पदार्थाची विक्री केल्यास लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे अशा ठिकाणी गुटखाजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास अशा दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आदेश अन्न सुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिले आहेत. मात्र जिल्ह्यात आत्तापर्यत एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे अन्न औषधी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात २ हजार ८०० व्यापा-यांनी अन्न औषधी प्रशासन विभागाकडून परवाने काढले आहेत. त्याव्यतिरिक्त १३ हजार ५१५ छोट्या व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे.गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गुटख्यासह सुगंधी तंबाखूची विक्री राजरोसपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे पानटपरी धारकच नाही तर अन्न पदार्थ विक्री करणारे मोठे दुकानदारही गुटखा विक्री करीत असल्याचे चित्र आहे.यामुळे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लघन, आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता राज्य अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्त दराडे यांनी आदेश काढून ज्या ठिकाणी अन्न पदार्थाची विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असेल अशा दुकानदारावर कडक कारवाई करावी वेळ पडल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा अन्न सुरक्षा विभागाला दिले आहेत. असे असताना जिल्ह्यात कारवाईकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे चित्र आहे.उत्पादनावरच कारवाईची मागणीएकीकडे गुटखाबंदी केली जात असतानाच ती फोल ठरली आहे. त्यामुळे गुटख्याच्या विक्रीपेक्षा उत्पादन करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाState Governmentराज्य सरकार