शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा; रायघोळ नदीच्या पुरातून मानवी साखळीद्वारे अनेकांनी गाठले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:13 IST

जालन्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

जालना : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात २६.९५ मिमी पाऊस झाला. तर जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ शिवारातील रायघोळ नदीला गुरूवारी पूर आला होता. त्यामुळे सायंकाळी शेतातून घरी परतणाºया शेतकरी, महिलांनी मानवी साखळी करून पुरातील पाण्यातून वाट शोधली.

गत दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी वाहत असून, प्रकल्पातील पाणीपातळीतही समाधानकारक वाढ होत आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गुरूवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी २६.९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अंबड तालुक्यातील वडीगोद्री महसूल मंडळात तब्बल १३६ मिमी झाला आहे. तर गोंदी मंडळात ९५ मिमी, जालना तालुक्यातील सेवली मंडळात ६८ मिमी, भोकरदन तालुक्यातील अन्वा मंडळात ८० मिमी, परतूर महसूल मंडळात ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय पिंपळगाव रेणुकाई मंडळात ४५ मिमी, केदारखेडा ४३ मिमी, पांगरी गोसावी ४५ मिमी पाऊस झाला आहे. इतर महसूल मंडळातही कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.

अंबड तालुक्यात सर्वाधिक पाऊसगत २४ तासात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४५.४३ मिमी पाऊस झाला आहे. भोकरदन तालुक्यात ३९.१३ मिमी, परतूर तालुक्यात २७.२० मिमी, जाफराबाद तालुक्यात २३.४० मिमी, घनसावंगी तालुक्यात २१.८६ मिमी, जालना तालुक्यात २१.५० मिमी, बदनापूर तालुक्यात १९.८० मिमी तर मंठा तालुक्यात १७.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसfloodपूर