शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:42 IST

राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.

ठळक मुद्देवन महोत्सव : जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट, रोपवाटिकेत मुबलक रोपांची उपलब्धता

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.जालना जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट दिले असून, त्यात ग्रामपंचायतींना ८ लाख ४९ हजार, बांधकाम विभाग ३४ हजार, सामाजिक वनिकरण सहा लाख, वन विभाग साडेचार लाख, ग्रामीण विकास यंत्रणा दोन लाख, कृषी विभाग पाच लाख, पोलीस यंत्रणा १९ हजार, वीज वितरण, जलसंघारण असे अनुक्रमे सात ते आठ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ८६ रोपवाटीका असून, त्यांच्याकडे ५० लाखापेक्षा अधिकची विविध प्रजातींची रोपे उपलब्ध असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्हाभरात ३७ लाख लहानमोठी खड्डे खोदण्यात आले असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख वृक्ष लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, वसनसरंक्षक अधिकारी शिंदे आदी लक्ष ठेवून असल्याचे एकनाथ कान्हेरे म्हणाले. रोपवाटीकेतून यंदा जिल्ह्यात विक्रमी रोपांची निर्मिती व संगोपन करण्यात आले असून, पुढीलवर्षी देखील रोपांची चणचण भासणार नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच सध्या विविध शासकीय कार्यालयात वृक्ष लागवडी अंतर्गत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडूनही वृक्ष लागवडीचे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.जालना : हरित सेनेचे ५६ हजार सदस्यजालना जिल्ह्यात हरितसेनेचे सदस्य करून घेण्यासाठी एक लाख सदस्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आता पर्यंत जवळपास ५६ हजार नागरिकांनी हरित सेनेत सहभागासाठी नोंदणी केली असल्याची माहिती देण्यात आली. या हरित सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवडीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.१ ते ३१ जुलै दरम्यान ही विशेष वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रोपांचे संगोपन करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांचे शेत अथवा घर तसेच शासकीय कार्यालय असल्यास त्या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भविष्यात याचे संपूर्ण सर्व्हेक्षण हे उपकग्रहामार्फत करण्यात येणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालना