शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:42 IST

राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.

ठळक मुद्देवन महोत्सव : जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट, रोपवाटिकेत मुबलक रोपांची उपलब्धता

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.जालना जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट दिले असून, त्यात ग्रामपंचायतींना ८ लाख ४९ हजार, बांधकाम विभाग ३४ हजार, सामाजिक वनिकरण सहा लाख, वन विभाग साडेचार लाख, ग्रामीण विकास यंत्रणा दोन लाख, कृषी विभाग पाच लाख, पोलीस यंत्रणा १९ हजार, वीज वितरण, जलसंघारण असे अनुक्रमे सात ते आठ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ८६ रोपवाटीका असून, त्यांच्याकडे ५० लाखापेक्षा अधिकची विविध प्रजातींची रोपे उपलब्ध असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्हाभरात ३७ लाख लहानमोठी खड्डे खोदण्यात आले असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख वृक्ष लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, वसनसरंक्षक अधिकारी शिंदे आदी लक्ष ठेवून असल्याचे एकनाथ कान्हेरे म्हणाले. रोपवाटीकेतून यंदा जिल्ह्यात विक्रमी रोपांची निर्मिती व संगोपन करण्यात आले असून, पुढीलवर्षी देखील रोपांची चणचण भासणार नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच सध्या विविध शासकीय कार्यालयात वृक्ष लागवडी अंतर्गत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडूनही वृक्ष लागवडीचे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.जालना : हरित सेनेचे ५६ हजार सदस्यजालना जिल्ह्यात हरितसेनेचे सदस्य करून घेण्यासाठी एक लाख सदस्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आता पर्यंत जवळपास ५६ हजार नागरिकांनी हरित सेनेत सहभागासाठी नोंदणी केली असल्याची माहिती देण्यात आली. या हरित सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवडीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.१ ते ३१ जुलै दरम्यान ही विशेष वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रोपांचे संगोपन करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांचे शेत अथवा घर तसेच शासकीय कार्यालय असल्यास त्या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भविष्यात याचे संपूर्ण सर्व्हेक्षण हे उपकग्रहामार्फत करण्यात येणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालना