शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:42 IST

राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.

ठळक मुद्देवन महोत्सव : जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट, रोपवाटिकेत मुबलक रोपांची उपलब्धता

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.जालना जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट दिले असून, त्यात ग्रामपंचायतींना ८ लाख ४९ हजार, बांधकाम विभाग ३४ हजार, सामाजिक वनिकरण सहा लाख, वन विभाग साडेचार लाख, ग्रामीण विकास यंत्रणा दोन लाख, कृषी विभाग पाच लाख, पोलीस यंत्रणा १९ हजार, वीज वितरण, जलसंघारण असे अनुक्रमे सात ते आठ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ८६ रोपवाटीका असून, त्यांच्याकडे ५० लाखापेक्षा अधिकची विविध प्रजातींची रोपे उपलब्ध असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्हाभरात ३७ लाख लहानमोठी खड्डे खोदण्यात आले असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख वृक्ष लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, वसनसरंक्षक अधिकारी शिंदे आदी लक्ष ठेवून असल्याचे एकनाथ कान्हेरे म्हणाले. रोपवाटीकेतून यंदा जिल्ह्यात विक्रमी रोपांची निर्मिती व संगोपन करण्यात आले असून, पुढीलवर्षी देखील रोपांची चणचण भासणार नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच सध्या विविध शासकीय कार्यालयात वृक्ष लागवडी अंतर्गत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडूनही वृक्ष लागवडीचे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.जालना : हरित सेनेचे ५६ हजार सदस्यजालना जिल्ह्यात हरितसेनेचे सदस्य करून घेण्यासाठी एक लाख सदस्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आता पर्यंत जवळपास ५६ हजार नागरिकांनी हरित सेनेत सहभागासाठी नोंदणी केली असल्याची माहिती देण्यात आली. या हरित सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवडीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.१ ते ३१ जुलै दरम्यान ही विशेष वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रोपांचे संगोपन करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांचे शेत अथवा घर तसेच शासकीय कार्यालय असल्यास त्या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भविष्यात याचे संपूर्ण सर्व्हेक्षण हे उपकग्रहामार्फत करण्यात येणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालना