शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:42 IST

राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.

ठळक मुद्देवन महोत्सव : जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट, रोपवाटिकेत मुबलक रोपांची उपलब्धता

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.जालना जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट दिले असून, त्यात ग्रामपंचायतींना ८ लाख ४९ हजार, बांधकाम विभाग ३४ हजार, सामाजिक वनिकरण सहा लाख, वन विभाग साडेचार लाख, ग्रामीण विकास यंत्रणा दोन लाख, कृषी विभाग पाच लाख, पोलीस यंत्रणा १९ हजार, वीज वितरण, जलसंघारण असे अनुक्रमे सात ते आठ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ८६ रोपवाटीका असून, त्यांच्याकडे ५० लाखापेक्षा अधिकची विविध प्रजातींची रोपे उपलब्ध असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्हाभरात ३७ लाख लहानमोठी खड्डे खोदण्यात आले असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख वृक्ष लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, वसनसरंक्षक अधिकारी शिंदे आदी लक्ष ठेवून असल्याचे एकनाथ कान्हेरे म्हणाले. रोपवाटीकेतून यंदा जिल्ह्यात विक्रमी रोपांची निर्मिती व संगोपन करण्यात आले असून, पुढीलवर्षी देखील रोपांची चणचण भासणार नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच सध्या विविध शासकीय कार्यालयात वृक्ष लागवडी अंतर्गत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडूनही वृक्ष लागवडीचे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.जालना : हरित सेनेचे ५६ हजार सदस्यजालना जिल्ह्यात हरितसेनेचे सदस्य करून घेण्यासाठी एक लाख सदस्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आता पर्यंत जवळपास ५६ हजार नागरिकांनी हरित सेनेत सहभागासाठी नोंदणी केली असल्याची माहिती देण्यात आली. या हरित सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवडीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.१ ते ३१ जुलै दरम्यान ही विशेष वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रोपांचे संगोपन करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांचे शेत अथवा घर तसेच शासकीय कार्यालय असल्यास त्या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भविष्यात याचे संपूर्ण सर्व्हेक्षण हे उपकग्रहामार्फत करण्यात येणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालना