शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

जालना जिल्ह्यात यावर्षी १६ हजार झाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:08 IST

जालना जिल्ह्यात २० हेक्टर वनक्षेत्र परिसरात १६ हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

जालना : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेसाठी जालना जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. या योजनेतील वृक्ष लागवडीसाठी खड्डे घेण्यासह अन्य कामेही पूर्ण होत आली आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग कामाला लागला आहे. जालना जिल्ह्यात २० हेक्टर वनक्षेत्र परिसरात १६ हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.वाढती लोकसंख्या, उद्योग, शेतीचा विस्तार, सिंचन व इतर प्रकल्प यामुळे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. जंगल तोडीमुळे जगाला तापमानातील वाढ, हवामानात बदल व ऋतू बदलाचे परिणाम आताच दिसायला लागले आहेत. हे सर्व दृष्परिणाम टाळण्यासाठी राज्य शासनाने २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावर्षी ३३ कोटी वृक्षांची राज्यभरात लागवड होणार आहे.या पावसाळ्यात जिल्ह्यात वन विभागामार्फत १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान शहराजवळील २० हेक्टर क्षेत्रावर १६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी ८०० खड्डे करण्याचे काम सुरु आहे. शहरातील नर्सरीमधून ही रोपे आणण्यात येणार असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी एस. एन. गुरकुले यांनी दिली. दरम्यान, दरवर्षी वन विभागाकडून वृक्षांची लागवड करण्यात येते. परंतु, या वृक्षांना उन्हाळ््यात पाणी देण्यात येत नसल्याने ती पुन्हा करपून जातात. याकडे कोणाचेच लक्ष नसते. झाडे लावली जातात त्यांना जगविणे महत्वाचे आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Beedबीडforest departmentवनविभागState Governmentराज्य सरकार