शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जालना जिल्ह्यात ३४ टक्केच पशुगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:27 IST

मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे. दरम्यान, निवडणूक व तांत्रिक अडचणीमुळे पशुगणना संथगतीने सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पशुगणना करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले. यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन दिली होती.पशुगणना करण्यासाठी १०७ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे प्रगणक घरोघरी जाऊन जनावरांची माहिती गोळा करीत आहेत. ग्रामीण भागातील ३ लाख २० हजार ९०८ कुटुंबांपैकी १ लाख २४ हजार ४४५ कुटुंबांना प्रगणकांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. तर शहरी भागातील ७४ हजार ७१३ कुटुंबांपैकी १२ हजार ६४३ कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे.दरम्यान, मार्च महिना संपत आला आहे. सरकारने दिलेली डेडलाईनही काही दिवसांतच संपणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील पशुगणना पुर्ण झालेली नाही. आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पशूंची गणना करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण दुष्काळाचा कसा सामना करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गणना बंद : कर्मचारी निवडणुकीच्या कामातलोकसभेच्या निवडणूका असल्यामुळे पशुसंवर्धन विभागातील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे सध्या तरी पशुगणना होत नसल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.इंटरनेट नसल्याने अडचणीपशुगणना ही आॅनलाईन झाली असून, यासाठी आॅनलाईन माहिती भरावी लागत आहे. परंतु, अनेक गावांमध्ये नेट चालत नसल्याने प्रगणकांना अडचणी येत आहे. त्यामुळे प्रगणकांना नाईलाजाने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन माहिती भरावी लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक