शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जालना जिल्ह्यात ३४ टक्केच पशुगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:27 IST

मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे. दरम्यान, निवडणूक व तांत्रिक अडचणीमुळे पशुगणना संथगतीने सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पशुगणना करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले. यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन दिली होती.पशुगणना करण्यासाठी १०७ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे प्रगणक घरोघरी जाऊन जनावरांची माहिती गोळा करीत आहेत. ग्रामीण भागातील ३ लाख २० हजार ९०८ कुटुंबांपैकी १ लाख २४ हजार ४४५ कुटुंबांना प्रगणकांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. तर शहरी भागातील ७४ हजार ७१३ कुटुंबांपैकी १२ हजार ६४३ कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे.दरम्यान, मार्च महिना संपत आला आहे. सरकारने दिलेली डेडलाईनही काही दिवसांतच संपणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील पशुगणना पुर्ण झालेली नाही. आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पशूंची गणना करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण दुष्काळाचा कसा सामना करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गणना बंद : कर्मचारी निवडणुकीच्या कामातलोकसभेच्या निवडणूका असल्यामुळे पशुसंवर्धन विभागातील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे सध्या तरी पशुगणना होत नसल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.इंटरनेट नसल्याने अडचणीपशुगणना ही आॅनलाईन झाली असून, यासाठी आॅनलाईन माहिती भरावी लागत आहे. परंतु, अनेक गावांमध्ये नेट चालत नसल्याने प्रगणकांना अडचणी येत आहे. त्यामुळे प्रगणकांना नाईलाजाने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन माहिती भरावी लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक