शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात ३४ टक्केच पशुगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:27 IST

मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे. दरम्यान, निवडणूक व तांत्रिक अडचणीमुळे पशुगणना संथगतीने सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पशुगणना करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले. यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन दिली होती.पशुगणना करण्यासाठी १०७ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे प्रगणक घरोघरी जाऊन जनावरांची माहिती गोळा करीत आहेत. ग्रामीण भागातील ३ लाख २० हजार ९०८ कुटुंबांपैकी १ लाख २४ हजार ४४५ कुटुंबांना प्रगणकांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. तर शहरी भागातील ७४ हजार ७१३ कुटुंबांपैकी १२ हजार ६४३ कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे.दरम्यान, मार्च महिना संपत आला आहे. सरकारने दिलेली डेडलाईनही काही दिवसांतच संपणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील पशुगणना पुर्ण झालेली नाही. आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पशूंची गणना करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण दुष्काळाचा कसा सामना करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गणना बंद : कर्मचारी निवडणुकीच्या कामातलोकसभेच्या निवडणूका असल्यामुळे पशुसंवर्धन विभागातील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे सध्या तरी पशुगणना होत नसल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.इंटरनेट नसल्याने अडचणीपशुगणना ही आॅनलाईन झाली असून, यासाठी आॅनलाईन माहिती भरावी लागत आहे. परंतु, अनेक गावांमध्ये नेट चालत नसल्याने प्रगणकांना अडचणी येत आहे. त्यामुळे प्रगणकांना नाईलाजाने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन माहिती भरावी लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक