शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात आठ सखी मतदान केंदे्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 01:03 IST

लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यात आठ मतदान केंद्रे सखी तर सहा आदर्श मतदान केंद्र राहणार आहेत. या मतदान केंद्रावर ५६७३ पुरूष तर ५३२१ महिला मतदान करणार आहेत.जालना मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १८ लाख मतदार २ हजार मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास १५ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागातर्फे चार टप्प्यांत मतदान प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील आठ मतदान केंद्र यंदा प्रथमच महिलांच्या हाती देण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर महिला कामकाज पाहणार आहेत. या मतदान केंद्राला सखी म्हणून असे नाव देण्यात आले आहे.तसेच सहा आदर्श मतदान केंद्रे ही राहणार आहेत. आठ सखी केंद्रांवर २९५१ पुरूष तर २७७२ महिला असे एकूण ५७२३ जण मतदान करणार आहेत. आदर्श मतदान केंद्रावर २७२२ पुरूष तर २५४९ महिला असे एकूण ५२७१ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत.आदर्श मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, रॅम व अन्य आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.दरम्यान, निवडणूक विभागाच्यावतीने सखी, महिला, दिव्यांगांसाठी या विशेष मतदान केंद्रांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राजीव नंदकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानGovernmentसरकार