शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहराचा सांडपाणी प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:41 IST

केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदार मिळत नसल्याने रखडला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा चौथ्यांदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंत्राटदाराने ती भरली. असे असताना जालना पालिकेकडे जी अनामत रक्कम भरणे आवश्यक असते, ती न भरल्याने नव्याने निविदा काढण्याबाबत पालिका विचार करत असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देकंत्राटदार मिळेना : पाचव्यांदा निविदा काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदार मिळत नसल्याने रखडला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा चौथ्यांदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंत्राटदाराने ती भरली. असे असताना जालना पालिकेकडे जी अनामत रक्कम भरणे आवश्यक असते, ती न भरल्याने नव्याने निविदा काढण्याबाबत पालिका विचार करत असल्याचे सांगण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक महापालिका तसेच पालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात सांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून यासाठी जालना जिल्ह्याला एकूण प्रकल्पासाठी २६० कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. परंतु एकाचवेळी हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य नसल्याने त्यासाठी दोन किंवा तीन टप्पे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सुचनेनुसार जीवन प्राधिकरण विभागाकडून त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नदीला मिळणाऱ्या सर्व नाल्यांचे पाणी एकत्रित करून ते एका दोन पाईपलाईनव्दारे रोहनवाडी येथील पूलाजवळ नेऊन तेथे सांडपाणी स्वच्छ करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे स्वच्छ झालेले पाणी पुन्हा शेतीसह काही उद्योगांना देण्याचा विचार आहे. यामुळे शहरातील नदी स्वच्छ होऊन पाण्याचा पुनर्वापर करणे सोयीचे ठरणार आहे.प्रकल्प : शेती उद्योगासाठी पर्वणी ठरणारसांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्प जालन्यात कार्यान्वित झाल्यास त्याचा खºया अर्थाने येथील विविध उद्योगांना होणार आहे. स्वच्छ केलेले पाणी उद्योगांसाठी उपयोगात येऊ शकते तर काही ठिकाणी या प्रकल्पापासून शेतकºयांना पाईपलाईन टाकण्याची मुभाही देण्यात येणार आहे. एकूणच हा प्रकल्प शेती आणि उद्योगासाठी पर्वणी ठरू शकतो.एकूणच जालन्यातील भूमिगत गटार योजना अद्यापही म्हणजेच तब्बल १९ वर्षापासून रखडलेली आहे. त्यामुळे या सांडपाणी प्रकल्पाचे तसे होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. चारवेळेस निविदा काढूनही किचकट निकषांमुळे कंत्राटदार पुढे येत नसल्याने आता पालिका प्रशसन नव्याने ही प्रक्रिया करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद