शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

जालना शहराचे पाणी पुन्हा चोरांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:12 IST

जालना शहराला वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक जाम संतापले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराला वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक जाम संतापले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पाणी चोरांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीसांना आलेल्या अपयशचा मोठा फटका जालन्यातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपाासून सहन करावा लागत आहे. २४ जानेवारीला पालिकेच्या पथकाने अचानक पाहणी करून पाण्यावर दरोडा घालणाऱ्यांविरूध्द पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते. परंतु निवडणूकीची संधी साधून पाणी चोरांनी त्यांचा गोरखधंदा पुन्हा जोरात सुरू केल्याचे उघड झाले आहे.जालना शहाराला २० - २० दिवस पाणीपुरवठा होत असल्याने मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील पालिकेच्या तसेच वैय्यक्तीक हातपंपच हे कमी पाऊस पडल्याने आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्वस्वी पालिकेच्या भरवशावरच तहान भागवण्याची वेळ आली आहे. असे असताना, जालना पालिकेकडून काहीच केले जात नाही. अशी ओरड नागरिकांमधून होत होती. यावर खुलासा करताना बुधवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्यला यांनी पत्र परिषद घेऊन पाण्याची चोरी ही पैठण ते पाचोड दरम्यान असलेले शेतकरी तसेच अंबड पालिकेकडून होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. अंबड पालिका देखील त्यांना केवळ तीन एमलएलडी पाणी घेण्याचे करारात नमूद असताना ते सहा एमलडी पाणी उपसा करत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पाणी घेण्याची नोंद असणारे मीटर बसविण्या बाबत वारंवार सूचना करूनही ते बसवत नसल्याचे संगीता गोरंट्याल म्हणाल्या.त्यातच ग्रामिण भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे टँकर भरण्यासाठी देखील जालन्याच्या पाण्यातूनच ते भरले जात होते. १५ टँकरच्या केवळ ४५ फेºया करणे अपेक्षित असताना येथून थेट ९० टँकर भरले जात असल्याची माहिती प्रत्यक्ष अंबड येथे माजी आ. कैलास गोरंट्याल आणि नगरसेवकांनी अचानक भेट दिली असता दिसून आल्याचे गोरंट्याल म्हणाले.या संदर्भात गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी संपर्क साधून या बाबत माहिती दिली. याची तातडीने दखल घेतल्याचे बिनवडे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर बिनवडे यांनी गुरूवारी सकाळी जालना पालिकेच्या मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेऊन पाणी चोरांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सरंक्षण देण्याची तयारी दर्शवली.वॉल्व्हमधून चोरी सुरूचजालना शहरासाठीच्या जलवाहिनीची वॉल्व्ह फोडून त्यातून हजारो लिटर पाण्याची चोरी करण्याचा प्रकार पैठण ते अंबड मार्गावरील श्ेतकरी तसेच टॅँकर लॉबीकडून सुरू आहेत. हे रोखण्यासाठी आम्ही यापूर्वीच आठ जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात २५ जानेवरीलाच गुन्हे दाखल केले आहेत. परंतु नंतर निवडणूक जाहीर झाल्याने पोलिसांना निवडणूकीच्या कामावर जावे लागले. त्याचा परिणाम म्हणून ही चोरी पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे शेततळे तसेच विहिरींमध्ये व्हॉल्व फोडून पाणी घेतले आहे.आयुक्त देणार भेट : २० एमएलडीची चोरीचार मे रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे पैठण ते जालना दरम्यान असलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी करणार असून, त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर,उपमुख्याधिकारी केशव कानपुडे, अभियंता लोंढे, बगळे हे देखील राहणार असून, पोलिस अधिकारी हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.केंद्रेकर भेट देणार असल्याने यंत्रणा सज्ज झाली असून, त्यांच्या दौºयापूर्वी सर्वकाही अलबेल असल्याचे दाखविण्यात येईल.जालना शहरासाठीच्या पैठण ते जालना दरम्यान असलेल्या जलवाहिनिला भगदाड पाडून त्यातून जवळपास २० एमएलडी पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे जालना शहराला केवळ सहा एमलडी पाणी मिळत असल्याने त्याचे समान वितरण करताना अडचण येत असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान घाणेवाडीत अतिरिक्त चार नवीन वीजपंप टाकून एक एमएलडी पाणी उचलण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्ष