शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मृत्यूची विहीर! नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत; दोन दिवसांत दोन अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:38 IST

जालन्यात कार विहिरीत कोसळून मायलेकींचा मृत्यू; अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची मागणी 

जालना: जामवाडी येथे कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वीच घडली होती. त्यानंतर आज (रविवारी) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून मायलेकींचा मृत्यू  झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

आरती गोपाल फांदडे (३०) व माही गोपाल फांदडे (४ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम) या माय-लेकीचा या अपघातात मृत्यू झाला. तर गोपाल विठ्ठल फादडे (३५ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम), वेदिका फादडे (दीड वर्ष), जय गुणवंत वानखेडे (१७ रा. देवठाणा ता. मानोरा जि.वाशिम) हे तिघे गंभीर जखमी झाले. वाशीम जिल्ह्यातील फादडे कुटुंबिय रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारमधून औरंगाबाद- देऊळगाव राजा मार्गावरून जात होते. त्यांची कार जामवाडी शिवारात आली असता समोरून अचानक एक ट्रक कारच्या दिशेने आला. त्यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून गोपाळ फादडे, वेदिका फादडे, जय वानखेडे या तिघांना विहिरीबाहेर काढले. या अपघातात आरती फादडे व त्यांच्या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. जखमींवर जालना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत एक कार पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.जामवाडी येथे रस्त्याच्या शेजारीच एक विहीर आहे. रस्ता वळणदार असल्यानं या भागात असलेली विहीर धोकादायक बनली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात होऊन वाहन विहिरीत कोसळत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.