शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूची विहीर! नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत; दोन दिवसांत दोन अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:38 IST

जालन्यात कार विहिरीत कोसळून मायलेकींचा मृत्यू; अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची मागणी 

जालना: जामवाडी येथे कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वीच घडली होती. त्यानंतर आज (रविवारी) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून मायलेकींचा मृत्यू  झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

आरती गोपाल फांदडे (३०) व माही गोपाल फांदडे (४ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम) या माय-लेकीचा या अपघातात मृत्यू झाला. तर गोपाल विठ्ठल फादडे (३५ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम), वेदिका फादडे (दीड वर्ष), जय गुणवंत वानखेडे (१७ रा. देवठाणा ता. मानोरा जि.वाशिम) हे तिघे गंभीर जखमी झाले. वाशीम जिल्ह्यातील फादडे कुटुंबिय रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारमधून औरंगाबाद- देऊळगाव राजा मार्गावरून जात होते. त्यांची कार जामवाडी शिवारात आली असता समोरून अचानक एक ट्रक कारच्या दिशेने आला. त्यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून गोपाळ फादडे, वेदिका फादडे, जय वानखेडे या तिघांना विहिरीबाहेर काढले. या अपघातात आरती फादडे व त्यांच्या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. जखमींवर जालना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत एक कार पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.जामवाडी येथे रस्त्याच्या शेजारीच एक विहीर आहे. रस्ता वळणदार असल्यानं या भागात असलेली विहीर धोकादायक बनली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात होऊन वाहन विहिरीत कोसळत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.