शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

रिकव्हरीत जालना अकराव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ५८२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहेत. तर १२ हजार ०३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३३३ ...

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ५८२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहेत. तर १२ हजार ०३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३३३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवाव लागला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे . मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याचा सर्वाधिक ९६.५ टक्के रिकव्हरी रेट आहे. त्यापाठोपाठ जालन्याचा क्रमांक लागतो.

राज्याचा विचार केल्यास राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४९ टक्के आहेत. त्या तुलनेत जालन्याचा रिकव्हरी रेट जास्त आहे. राज्यात पालघर जिल्ह्याचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. त्यानंतर अहमदनगर, हिंगोली, जळगाव, नाशिक, रायगड, अमरावती, गोदिया, सांगली, धुळेनंतर जालन्याचा क्रमांक लागतो. जालन्यानंतर कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, गडचिरोली, लातूर, बीड, अकोला, भंडारा, नंदुरबार, रत्नागिरी आदी जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. असे असले तरी विदेशात कोरोनाने रूप बदल्याने रूग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नाही. अनेकजण विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जालन्यात २१६ सक्रिय रूग्ण

राज्यात हिंगोली जिल्ह्यात केवळ ५५ सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ परभणी २०३, पालघर २१३ आणि जालन्यात २१६ रूग्ण सक्रिय आहेत. त्यानंतर वाशिम २२०, उस्मानाबाद २५५ तर सांगली जिल्ह्यात २६७ सक्रिय रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. सदर आकडेवारी ही मंग‌ळवारपर्यंतची आहे.