शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रिकव्हरीत जालना अकराव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ५८२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहेत. तर १२ हजार ०३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३३३ ...

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ५८२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहेत. तर १२ हजार ०३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३३३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवाव लागला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे . मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याचा सर्वाधिक ९६.५ टक्के रिकव्हरी रेट आहे. त्यापाठोपाठ जालन्याचा क्रमांक लागतो.

राज्याचा विचार केल्यास राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४९ टक्के आहेत. त्या तुलनेत जालन्याचा रिकव्हरी रेट जास्त आहे. राज्यात पालघर जिल्ह्याचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. त्यानंतर अहमदनगर, हिंगोली, जळगाव, नाशिक, रायगड, अमरावती, गोदिया, सांगली, धुळेनंतर जालन्याचा क्रमांक लागतो. जालन्यानंतर कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, गडचिरोली, लातूर, बीड, अकोला, भंडारा, नंदुरबार, रत्नागिरी आदी जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. असे असले तरी विदेशात कोरोनाने रूप बदल्याने रूग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नाही. अनेकजण विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जालन्यात २१६ सक्रिय रूग्ण

राज्यात हिंगोली जिल्ह्यात केवळ ५५ सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ परभणी २०३, पालघर २१३ आणि जालन्यात २१६ रूग्ण सक्रिय आहेत. त्यानंतर वाशिम २२०, उस्मानाबाद २५५ तर सांगली जिल्ह्यात २६७ सक्रिय रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. सदर आकडेवारी ही मंग‌ळवारपर्यंतची आहे.