शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच मज तप फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:15 IST

मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्ककुठल्याही कामामध्ये निष्ठा, समर्पण भाव आणि लोकहित लक्षात घेतल्यास त्यातून मिळणारा आनंद आणि पक्षनिष्ठेचे फळ म्हणजेच माझी ही गोदावरी विकास खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरील निवड होय. पूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९८८ मध्ये शिवसेनेशी नाळ जुळली. ती आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून घट्ट बनली आहे. मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले. त्यांची ही मुलाखतप्राधान्य कोणत्या बाबींना द्याल ?मराठवाड्यातील जालना जिल्हा हा कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. कागदोपत्री सिंचनाचा अनुशेष पूर्ण झाल्याचे दर्शविले जात असले तरी वास्तव तसे नाही. त्यामुळे सिंचनाच्या अनुशेषाचा अभ्यास करून बापकळ, बरबडा यासह अन्य सिंचन प्रकल्प मार्गी लावून शेती आणि पिण्याला पाणी उपलब्ध करून देण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.या संधीकडे आपण कसे पाहता ?पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला ही महत्त्वाची जबाबदारी लाभली आहे. २००१ ते २००६ या काळात आपण जनतेतून नगराध्यक्ष झालो होतो. तेव्हांही अनेक लोकोपयोगी कामे केली. येथेही हेच धोरण राहणार आहे.घरातील राजकीय वारसा नसताना केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरित होऊन आपण राजकारणात प्रवेश केला. कधी यश तर कधी अपयश आले म्हणून पक्षाशी निष्ठा सोडली नाही. अनेक प्रलोभने आली परंतु निष्ठा न ढळू दिल्यानेच राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे पद मिळालेअनेक प्रकल्प अपूर्णसिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वॉटरग्रीड योजना प्रस्तावित आहे. तिचे आपण स्वागतच करत असून, असे असले तरी जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा मुद्दा मार्गी लावू .आपण महाबीजचे संचालक असताना देखील जालन्यात प्रक्रिया उद्योग सुरू केला होता.

टॅग्स :godavariगोदावरीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प