शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:42 IST

केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथील जेईएस महाविद्यालयात जालना एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले केले होते. यावेळी जेइएस संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना धर्माधिकारी म्हणाले की, देवाने प्रत्येकाला बुध्दी ही समान दिली आहे. त्या बुध्दीचा तो कसा वापर करतो हे महत्वाचे ठरते.जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी ध्येय निश्चित करून, त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आजच्या स्पर्धेच्या युगात सीईटी परीक्षेला महत्व दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येते. मात्र अधिकारी झाल्यावर त्याचा अहंकार बाळगू नये, तसेच गैरमार्गाने पैसा कमावणे हे उद्दिष्ट ठेवू नये असे ते म्हणाले. यश आणि अपयश हे जीवनात पदोपदी येत असते. त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता, हिंमतीने त्याला समारे जाण्याचे धाडस ठेवावे असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती ही उच्च दर्जाची असल्याचे सांगून आईस्टाईन या शास्त्रज्ञाने देखील भगवद्गीतेचा अभ्यास केल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा