शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

कर आकारणीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:49 IST

जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. याचवेळी त्यांनी गणेश विसर्जन मिरणूक तसेच रेल्वेस्थानक जवळील रेल्वे गेटजवळ भूयारी मार्ग उभारण्याचे निर्देशही खोतकरांनी रेल्वेच्या नांदेड येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.एकूणच खोतकरांनी जालन्यातील कोंडवाडे गायब होण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना प्राणी संरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून कारवाईचे निर्देश मुख्याधिका-यांना दिले. ग्रामीण भागातील माकडांचा बंदोबस्त ज्या प्रमाणे करण्यात आला होता, त्याच धर्तीवर शहरातील मोकाट कुत्र्यांवर तसा प्रयोग करता येईल काय, या बद्दल प्रशासनाने विचार करण्याचे सांगितले. जालन्यातील पािलकेच्या हद्दीतील रस्त्यांचा मुद्दही गंभीर असल्याचे ते म्हणाले. आम्ही आमच्या निधीतून नवीन रस्ते केले म्हणून तरी आज शहराची अवस्था बरी असल्याचा दावा त्यांनी केला.जालना पालिकेने गेल्या वर्षी नवीन कर आकारणीसाठी ज्या खाजगी एजन्सीला काम दिले होते. ते मुळात चुकीचे असून, हे काम करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र यंत्रणा असतांना खासगी एजन्सीचा हट्ट हा धरला असा सवालही त्यांनी केला. अंदाज समितीच्या अहवालावर लवकरच कारवाई होणार असून, सध्या पालिकेची जी चौकशी सुरू आहे, त्यातूनही अनेक गंभीर मुद्दे पुढे येणार आहेत. यातून सत्ताधाºयांना चांगलाच घाम फुटेल असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, रेल्वे संघर्षचे गणेशलाल चौधरी, फेरोज अली हजर होते.भुयारी मार्गाचे काम आठ दिवसांत करारेल्वे स्थानकाजवळील विद्युतनगरसह अन्य भागात जाणाºया रेल्वे गेटवर भुयारी रेल्वे मार्ग करण्यासाठी निधीची मंजुरी आहे. परंतु येथून जाणाºया पाण्याची विल्हेवाट कशी लावावी कशी, हा प्रश्न अनुत्तरित होता.त्यावर पर्याय म्हणून परतूर येथील पुलाच्या धर्तीवर येथेही स्वतंत्र हौद बांधून त्यातून विद्युत मोटार लावून ते उपसण्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. या संदर्भात रेल्वेच्या विभागीय अधिका-यांना मोबाईलवरून संपर्क केला. त्यावेळी हे काम आठवडाभरात सुरू केले जाईल.राऊत यांनी केली याचिका दाखलजालना शहरातील कर आकारणी करताना खासगी एजन्सीकडून हे काम करून घेताना पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत या कंपनीला ७० लाख रूपयांचे बिल अदा केले आहे. दरम्यान पालिकेने ही खाजगी एजन्सीकडून हे काम करून घेऊ नये, असे निर्देश नागपूर येथील उच्च न्यायालय खंडपीठाचे आहेत. असे असताना देखील जालना पालिकेने याकडे दुर्लक्ष केले.यामुळे जालना शहरातील नागरिकांवर थेट साडेचार कोटी रूपयांवरून २४ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. यावर आक्षेप दाखल करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि कुठलेही राजकारण या मुद्यात न आणता आपण औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात कर आकारणी विरोधात याचिका दाखल केल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी नगरसेविका संध्या देठे यांनीही तक्रार केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदArjun Khotkarअर्जुन खोतकरcivic issueनागरी समस्याTaxकर