शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कर आकारणीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:49 IST

जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. याचवेळी त्यांनी गणेश विसर्जन मिरणूक तसेच रेल्वेस्थानक जवळील रेल्वे गेटजवळ भूयारी मार्ग उभारण्याचे निर्देशही खोतकरांनी रेल्वेच्या नांदेड येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.एकूणच खोतकरांनी जालन्यातील कोंडवाडे गायब होण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना प्राणी संरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून कारवाईचे निर्देश मुख्याधिका-यांना दिले. ग्रामीण भागातील माकडांचा बंदोबस्त ज्या प्रमाणे करण्यात आला होता, त्याच धर्तीवर शहरातील मोकाट कुत्र्यांवर तसा प्रयोग करता येईल काय, या बद्दल प्रशासनाने विचार करण्याचे सांगितले. जालन्यातील पािलकेच्या हद्दीतील रस्त्यांचा मुद्दही गंभीर असल्याचे ते म्हणाले. आम्ही आमच्या निधीतून नवीन रस्ते केले म्हणून तरी आज शहराची अवस्था बरी असल्याचा दावा त्यांनी केला.जालना पालिकेने गेल्या वर्षी नवीन कर आकारणीसाठी ज्या खाजगी एजन्सीला काम दिले होते. ते मुळात चुकीचे असून, हे काम करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र यंत्रणा असतांना खासगी एजन्सीचा हट्ट हा धरला असा सवालही त्यांनी केला. अंदाज समितीच्या अहवालावर लवकरच कारवाई होणार असून, सध्या पालिकेची जी चौकशी सुरू आहे, त्यातूनही अनेक गंभीर मुद्दे पुढे येणार आहेत. यातून सत्ताधाºयांना चांगलाच घाम फुटेल असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, रेल्वे संघर्षचे गणेशलाल चौधरी, फेरोज अली हजर होते.भुयारी मार्गाचे काम आठ दिवसांत करारेल्वे स्थानकाजवळील विद्युतनगरसह अन्य भागात जाणाºया रेल्वे गेटवर भुयारी रेल्वे मार्ग करण्यासाठी निधीची मंजुरी आहे. परंतु येथून जाणाºया पाण्याची विल्हेवाट कशी लावावी कशी, हा प्रश्न अनुत्तरित होता.त्यावर पर्याय म्हणून परतूर येथील पुलाच्या धर्तीवर येथेही स्वतंत्र हौद बांधून त्यातून विद्युत मोटार लावून ते उपसण्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. या संदर्भात रेल्वेच्या विभागीय अधिका-यांना मोबाईलवरून संपर्क केला. त्यावेळी हे काम आठवडाभरात सुरू केले जाईल.राऊत यांनी केली याचिका दाखलजालना शहरातील कर आकारणी करताना खासगी एजन्सीकडून हे काम करून घेताना पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत या कंपनीला ७० लाख रूपयांचे बिल अदा केले आहे. दरम्यान पालिकेने ही खाजगी एजन्सीकडून हे काम करून घेऊ नये, असे निर्देश नागपूर येथील उच्च न्यायालय खंडपीठाचे आहेत. असे असताना देखील जालना पालिकेने याकडे दुर्लक्ष केले.यामुळे जालना शहरातील नागरिकांवर थेट साडेचार कोटी रूपयांवरून २४ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. यावर आक्षेप दाखल करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि कुठलेही राजकारण या मुद्यात न आणता आपण औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात कर आकारणी विरोधात याचिका दाखल केल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी नगरसेविका संध्या देठे यांनीही तक्रार केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदArjun Khotkarअर्जुन खोतकरcivic issueनागरी समस्याTaxकर