शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

जालना जिल्ह्यातील दूध संस्थांना वाढीव परवानगी घेण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:41 IST

दूध संकलनाच्या मुद्यावरून जो पेच निर्माण झाला होता, त्या संदर्भात लोकमतमधून शुक्रवारी वृत्त प्रसिध्द करताच यंत्रणेने खुलासा केला आहे. त्यानुसार आता ज्या संस्थांकडे केवळ शंभर लिटर दूध संकलनाची मर्यादा आहे, ती त्यांना वाढवून हवी असल्यास त्यांनी तशी लेखी परवानगी जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावी असे सूचविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दूध संकलनाच्या मुद्यावरून जो पेच निर्माण झाला होता, त्या संदर्भात लोकमतमधून शुक्रवारी वृत्त प्रसिध्द करताच यंत्रणेने खुलासा केला आहे. त्यानुसार आता ज्या संस्थांकडे केवळ शंभर लिटर दूध संकलनाची मर्यादा आहे, ती त्यांना वाढवून हवी असल्यास त्यांनी तशी लेखी परवानगी जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावी असे सूचविण्यात आले आहे.जालना जिल्ह्यातील अनेक नव्याने नोंदणीकृत संस्थांना त्यांनी केवळ दररोज शंभर लिटरच दूध संकलन करावे असे पत्र सर्व संस्थांना पाठविण्यात आले होते. तसेच जालना तसेच माहोरा येथील दूध संकलन आणि शितीकरण केंद्रासही तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून नवीन पेच निर्माण झाल्याने संस्थांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड होत होती.या संदर्भात शनिवारी लोकमतमधून वृत्त प्रसिध्द होताच, दूग्ध विकास विभागाने त्याची तातडीने दखल घेतली. तसेच दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून, परवानगी घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Jalanaजालनाmilkदूध