शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

प्रेरणादायी पुस्तकांची संगत असावी - दाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST

जालना : विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी मनात जिद्द अन् अपार कष्ट करण्याची तयारी ठेवावी. प्रेरणादायी पुस्तकेच आयुष्य बदलवून टाकतात, अशा ...

जालना : विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी मनात जिद्द अन् अपार कष्ट करण्याची तयारी ठेवावी. प्रेरणादायी पुस्तकेच आयुष्य बदलवून टाकतात, अशा पुस्तकांची संगत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन कवी प्रा. दिगंबर दाते यांनी गुरुवारी मकर संक्रांत व नामविस्तार दिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

मठपिंपळगाव (ता. अंबड) येथील मत्स्योदरी माध्यमिक विद्यालयात मकर संक्रांत व नामविस्तार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल भालेकर होते. यावेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, सुनील पवार, छगन बनकर उपस्थित होते. प्रा. दाते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाचा वेध घेण्यासाठी तसेच स्पर्धेत टिकायचे असेल तर चांगल्या प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करणे क्रमप्राप्त आहे.

डॉ. सुहास सदाव्रते म्हणाले की, शालेय जीवनातील संस्कार मनावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करण्यासाठी सतत उपक्रमशील राहावे. कार्यक्रमात पुणे येथील समकालीन प्रकाशन संस्थेमार्फत देण्यात आलेला पुस्तक संच साने गुरुजी कथामाला जालना शाखेतर्फे वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमाला भाऊसाहेब रनमळे, विलास आरसूळ, रमेश गाढवे, संभाजी वाघुंडे, काकासाहेब जिगे, रामेश्वर टोन्पे, मंदाकिनी कदम, जयश्री वाघमारे उपस्थित होत्या.