शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

संवेदनशील केंद्रांची निरीक्षकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:08 IST

अतिसंवेदनशील अशी २७ केंद्र आहेत. या केंद्राची पाहणी नुकतीच त्या-त्या विधानसभा मतदार संघातील निवडणूक निरीक्षकांनी केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदान केंद्रांत एकूण एक हजार ६५२ मतदान केंदे्र आहेत. त्यातील अतिसंवेदनशील अशी २७ केंद्र आहेत. या केंद्राची पाहणी नुकतीच त्या-त्या विधानसभा मतदार संघातील निवडणूक निरीक्षकांनी केली आहे. त्या संदर्भात त्यांनी त्यांचा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला आहे.यंदाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने बुधवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेते आणि पदाधिकारी सकाळी सात पासून घराच्या बाहेर पडून प्रथम ग्रामीण भागात सकाळी ९ च्या आत जात आहेत. नऊ वाजेनंतर अनेक महिला व पुरूष मंडळी ही शेतात कामे करण्यासाठी जातात. त्यामुळे त्यांना कामावर जाण्या आधीच गाठून मतदान करण्यासाठी रिझविण्याचे काम सुरू आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा आपल्या मतदारसंघात व्हाव्यात म्हणून अनेकजण वरिष्ठांकडे स्टार प्रचारकांना प्राधान्य देत आहेत. विधानसभेच्या निवडणूका शांततेत पार पडाव्यात म्हणून निवडणूक निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या समवेत बैठक घेऊन आढावा घेतला.या संवेदनशील मतदान केंद्रांवर शस्त्रधारी केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी सांगितले.बँक व्यवहारावर बारकाईने नजरजालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांतील क्षेत्रात येणा-या बँक व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर आहे. संशयित खात्यातून एक लाखापेक्षा अधिक रक्कम काढल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्व बँक व्यवस्थापकांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे सांगितले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग