शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

८२ शाळांवर झालेल्या साडेचार कोटींच्या खर्चाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:03 IST

झालेला खर्च पाण्यात गेला असून, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे  जि.प.सदस्य जयमंगल जाधव आणि अन्य सदस्यांनी केली.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या सभेत सीईओ अरोरा यांचे निर्देश

जालना : सर्व  शिक्षण अभियानातून गेल्यावर्षी  जिल्हा परिषदेच्या ८२ शाळांची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. त्यासाठी जवळपास साडेचार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हा झालेला खर्च पाण्यात गेला असून, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे  जि.प.सदस्य जयमंगल जाधव आणि अन्य सदस्यांनी केली. या मागणीनुसार सीईओ निमा अरोरा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश  दिले आहेत. 

मंगळवारी दुपारी जि.प.च्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली. त्यावेळी अनेक मुद्यांवरून प्रशासन आणि सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. यात प्रामुख्याने जयमंगल जाधव यांनी गेल्या वर्षभरात  जिल्ह्यातील ८२ शाळांवर देखभाल दुरुस्तीच्या नावावर खर्च करण्यात आला. हे पैसे खर्च करताना मुख्याध्यापकांकडून काही चिरीमिरी घेऊन हा निधी त्या शाळांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्यावर यावर बराच गोंधळ झाला. या सर्व प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्यात येईल, असा निर्णय सीईओ अरोरा यांनी घेतला. 

या मुद्यासह भाजपचे  शालीकराम म्हस्के यांनी आरोग्य  विभागाचा मुद्दा मांडून आज कोरोनाप्रमाणेच अन्य आजारही मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगून आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्याचे सांगितले. यावेळी अवधूत खडके यांनी अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने अनेक रस्ते खरडले असून, पूल वाहून गेले आहेत. याकडेही बांधकाम  विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. या सभेस अध्यक्ष उत्तमराव जाधव, उपाध्यक्ष पवार, उफाड, सीईओ अरोरा, अतिरिक्त मुख्याधिकारी सवडे आदींची उपस्थिती होती. 

कामे दर्जेदार झाली असल्याचा दावा सर्व शिक्षण अभियानातून ज्या ८२ शाळांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली आहे. ती करताना तेथील शालेय व्यवस्थापन समितीने सुचविल्यानुसार केली.  जी काही कामे झाली आहेत, ती दर्जेदार झाल्याचे जि.प.चे अभियंता ढवळे यांनी दिली. असे असले तरी चौकशी होणार असल्याने त्यातून सत्य लवकरच बाहेर येणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषदfundsनिधी