शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

महागाईची हद्द झाली; खताच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

जालना : खरिपाचा हंगाम आता जवळ येत असून, शेतकऱ्यांनी शेती मशागतीसह खते, बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु, ...

जालना : खरिपाचा हंगाम आता जवळ येत असून, शेतकऱ्यांनी शेती मशागतीसह खते, बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु, खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून जात आहे.

सततच्या स्मानी-सुल्तानी संकटांमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गत खरीप हंगामातील अतिवृष्टी, रब्बीतील अवकाळीसह रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनमध्ये उत्पादित मालही विक्री करणे मुश्किल झाले आहे. त्यात आता आगामी खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बाजारात खतासह बी-बियाणांचे दर वाढले आहेत. वाढलेले दर पाहून शेतकरी अवाक होत आहेत. त्यात शेती मशागतीसाठी लागणाऱ्या यंत्राचे दरही संबंधितांनी वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे.

शेतीच्या मशागतीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले

पूर्वी शेती मशागतीची बहुतांश कामे बैलांचा वापर करून केली जात होती. एकत्रित कुटुंब असल्याने आणि बहुतांशजण शेतात काम करीत असल्याने शेती कामाचा खर्च हा कमी होता. परंतु, आधुनिकीकरणामुळे आता शेती मशागतीची कामे ही यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यात आता इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने नांगरणी, पेरणी, मोगडणीसह इतर कामांच्या दरातही संबंधित यंत्र चालकांनी वाढ केली आहे. मशागतीचे वाढलेले दर, खताचे वाढलेले दर, बी-बियाणांचीही अशीच अवस्था ! त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असून, शासनाने खते, बी-बियाणांचे दर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम

शेतातील बहुतांश कामे आता यंत्राद्वारे केली जातात. त्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात मशागतीचे दर वाढत असल्याने आर्थिक फटकाही बसत आहे.

खताच्या किमतीत वाढ झाल्याने पिकांना खत टाकणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत खताच्या किमती अधिक झाल्या आहेत. ऊसासारख्या पिकाला तर मोठ्या प्रमाणात खत द्यावे लागते.

- दिलीप मते, वडीकाळ्या

शासन खताचे भाव वाढवून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. शेतकरी अस्मानी- सुल्तानी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची होणारी फरफट पाहता शासनाने खताचे दर नियंत्रित करून ते कमी करण्याची गरज आहे.

- विजय उढाण, मुरमा

शेतकरी सतत अस्मानी संकटांचा सामना करीत आहे. शासकीय योजनांपासूनही अनेक शेतकरी वंचित राहतात. त्यात आता खताचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

- अरूण कळकटे, भणंग जळगाव

डीएसपीचे दर आधीचे दर आताचे दर

१०-२६-२६ ११३० ११७५

१९-१९-१९ १२७५ १२७५

१२-३२-१६ ११५० ११८५

१८-४६-० १२५० १३२५