शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईची हद्द झाली; खताच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

जालना : खरिपाचा हंगाम आता जवळ येत असून, शेतकऱ्यांनी शेती मशागतीसह खते, बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु, ...

जालना : खरिपाचा हंगाम आता जवळ येत असून, शेतकऱ्यांनी शेती मशागतीसह खते, बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु, खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून जात आहे.

सततच्या स्मानी-सुल्तानी संकटांमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गत खरीप हंगामातील अतिवृष्टी, रब्बीतील अवकाळीसह रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनमध्ये उत्पादित मालही विक्री करणे मुश्किल झाले आहे. त्यात आता आगामी खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बाजारात खतासह बी-बियाणांचे दर वाढले आहेत. वाढलेले दर पाहून शेतकरी अवाक होत आहेत. त्यात शेती मशागतीसाठी लागणाऱ्या यंत्राचे दरही संबंधितांनी वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे.

शेतीच्या मशागतीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले

पूर्वी शेती मशागतीची बहुतांश कामे बैलांचा वापर करून केली जात होती. एकत्रित कुटुंब असल्याने आणि बहुतांशजण शेतात काम करीत असल्याने शेती कामाचा खर्च हा कमी होता. परंतु, आधुनिकीकरणामुळे आता शेती मशागतीची कामे ही यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यात आता इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने नांगरणी, पेरणी, मोगडणीसह इतर कामांच्या दरातही संबंधित यंत्र चालकांनी वाढ केली आहे. मशागतीचे वाढलेले दर, खताचे वाढलेले दर, बी-बियाणांचीही अशीच अवस्था ! त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असून, शासनाने खते, बी-बियाणांचे दर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम

शेतातील बहुतांश कामे आता यंत्राद्वारे केली जातात. त्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात मशागतीचे दर वाढत असल्याने आर्थिक फटकाही बसत आहे.

खताच्या किमतीत वाढ झाल्याने पिकांना खत टाकणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत खताच्या किमती अधिक झाल्या आहेत. ऊसासारख्या पिकाला तर मोठ्या प्रमाणात खत द्यावे लागते.

- दिलीप मते, वडीकाळ्या

शासन खताचे भाव वाढवून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. शेतकरी अस्मानी- सुल्तानी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची होणारी फरफट पाहता शासनाने खताचे दर नियंत्रित करून ते कमी करण्याची गरज आहे.

- विजय उढाण, मुरमा

शेतकरी सतत अस्मानी संकटांचा सामना करीत आहे. शासकीय योजनांपासूनही अनेक शेतकरी वंचित राहतात. त्यात आता खताचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

- अरूण कळकटे, भणंग जळगाव

डीएसपीचे दर आधीचे दर आताचे दर

१०-२६-२६ ११३० ११७५

१९-१९-१९ १२७५ १२७५

१२-३२-१६ ११५० ११८५

१८-४६-० १२५० १३२५