शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

By शिवाजी कदम | Updated: January 2, 2024 11:40 IST

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे.

जालना: शाळेत शिक्षकच उपलब्ध नसल्याने शिक्षण घ्यावे कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. आज सकाळी साडेदहा वाजता भाेकरदन तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येथे शाळा भरवली. जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे घेतले. सकाळी सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी घराकडे मार्गस्थ झाले.

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याची ओरड होत आहे. भोकरदन तालुक्यातील सहा गावातील विद्यार्थी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.

गुणवत्तेवर परिणामजिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्तेवर परिणाम होत आहे. भोकरदन तालुक्यात देखील शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतांना जिल्हा परिषदेने सुमारे चाळीस शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या करून त्यांना इतर कामे दिलेली आहेत. शिक्षकांना लिपिक,समन्वयक, गट समन्वयक अशा नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.

सोबत आणला डबाभोकरदन तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे साठ विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कार्यालया सोडायचे नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला होता. सकाळी नाष्टाकरून हे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यानंतर विद्यार्थांनी दुपारी सोबत आणलेल्या डब्यातून जेवण केले. सायंकाळी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली.

सहा शाळांचे विद्यार्थी कार्यालयातभोकरदन तालुक्यातील सहा गावातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. यात वाघ्रुळ, प्रिंप्री, सावखेडा, कोपर्डी,बरंगळा लोखंडे, बरंगळा साबळे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शाळा भरवली.

शाळांवर शिक्षक नाहीत जिल्ह्यात शिक्षकांची टंचाई असतांना जिल्हा परिषदेने काही शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयी काम करण्यासाठी नियुक्त केेले आहे. यामुळे ज्या शाळांवर या शिक्षकांची नियुक्ती आहे, येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवली.- नवनाथ लोखंडे, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन.

टॅग्स :Jalanaजालनाzp schoolजिल्हा परिषद शाळा