शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

By शिवाजी कदम | Updated: January 2, 2024 11:40 IST

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे.

जालना: शाळेत शिक्षकच उपलब्ध नसल्याने शिक्षण घ्यावे कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. आज सकाळी साडेदहा वाजता भाेकरदन तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येथे शाळा भरवली. जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे घेतले. सकाळी सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी घराकडे मार्गस्थ झाले.

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याची ओरड होत आहे. भोकरदन तालुक्यातील सहा गावातील विद्यार्थी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.

गुणवत्तेवर परिणामजिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्तेवर परिणाम होत आहे. भोकरदन तालुक्यात देखील शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतांना जिल्हा परिषदेने सुमारे चाळीस शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या करून त्यांना इतर कामे दिलेली आहेत. शिक्षकांना लिपिक,समन्वयक, गट समन्वयक अशा नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.

सोबत आणला डबाभोकरदन तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे साठ विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कार्यालया सोडायचे नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला होता. सकाळी नाष्टाकरून हे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यानंतर विद्यार्थांनी दुपारी सोबत आणलेल्या डब्यातून जेवण केले. सायंकाळी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली.

सहा शाळांचे विद्यार्थी कार्यालयातभोकरदन तालुक्यातील सहा गावातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. यात वाघ्रुळ, प्रिंप्री, सावखेडा, कोपर्डी,बरंगळा लोखंडे, बरंगळा साबळे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शाळा भरवली.

शाळांवर शिक्षक नाहीत जिल्ह्यात शिक्षकांची टंचाई असतांना जिल्हा परिषदेने काही शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयी काम करण्यासाठी नियुक्त केेले आहे. यामुळे ज्या शाळांवर या शिक्षकांची नियुक्ती आहे, येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवली.- नवनाथ लोखंडे, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन.

टॅग्स :Jalanaजालनाzp schoolजिल्हा परिषद शाळा