शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:36 IST

उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले असून, आज घडीला औद्योगिक वसहातीतील उद्योगांचा श्वास हा टँकरच्या भरवशावर सुरू आहे. जालना पालिकेने दररोज एमआयडीसला ५ एमएलडी पाणी द्यावे आणि महिन्याला ५० लाख रूपये घ्यावेत असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, तो सध्या नाकारण्यात आला असून, अंतर्गत जलवानीचे काम पूर्ण झाल्यावर यावर विचार करू असे पालिकेकडून सांगण्यात आले. तर औद्योगिक वसहातीसाठी पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा आणि जालनासाठीची ४५० कोटी रूपयांची योजना मंजूर आहे, परंतु ती या ना त्या कारणाने रखडली आहे.एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवेंसेदिवस वाढत असल्याने ग्रामिण भागातून शेकडो कामगार हे रोजगार शोधण्यासाठी जालन्यात येत आहेत. त्यातच जालन्यातील उद्योगही संकटात असल्याने त्यांना काम देणे अडचणीचे ठरत आहे. जालन्यातील प्रमुख उद्योग म्हणून स्टील उद्योगाकडे पाहिले जाते. या उद्योगातील सात बड्या स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगांना दररोज ५ एमलएलडी पाणी लागते आणि औद्योगिक विभागाकडून संपूर्ण एमआयडीसीला केवळ दीड एमलएलडी पाणी मिळत आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून उपयोगात आणले जात आहे.जालन्यातील अनेक स्टील उद्योजकांनी पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी, तिच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शेततळ्यांचा आधारही या उद्योगाने घेतला आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने हे शेततळे भरले नसल्याने आज जवळपास लाखो रूपये हे टँकरच्या पाण्यावर उद्योजकांचे खर्च होत आहेत. एकूणच पाण्या अभावी शहरातील बांधकाम व्यवसायावरही परिणाम दिसून आला असून, अनेकांनी बांधकामे पुढे ढकलली आहेत.जालना : पाणीपुरवठा वाढविण्याचे प्रयत्नया संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक महांडळाचे औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुधीर नागे यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना आणि शेंद्रा येथील उद्योगांना थेट पाणीपुरवठा करण्यासाठी ४५० कोटी रूपयांची ७२ एमएलडीची योजना मंजूर आहे. परंतु ती योजना या ना त्या कारणाने रखडली आहे. या योजनेतून जायकवाडी धरणातून थेट जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात येणार होते; परंतु या योजनेचे काम सध्या कासव गतीने सुरू असले तरी ती लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. असे असले तरी जानेवारीअखेरपर्यंत जालन्याला सध्यापेक्षा दोनपट जास्तीचा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.- सुधीर नागे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ

टॅग्स :MIDCएमआयडीसीwater scarcityपाणी टंचाई