शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:36 IST

उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले असून, आज घडीला औद्योगिक वसहातीतील उद्योगांचा श्वास हा टँकरच्या भरवशावर सुरू आहे. जालना पालिकेने दररोज एमआयडीसला ५ एमएलडी पाणी द्यावे आणि महिन्याला ५० लाख रूपये घ्यावेत असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, तो सध्या नाकारण्यात आला असून, अंतर्गत जलवानीचे काम पूर्ण झाल्यावर यावर विचार करू असे पालिकेकडून सांगण्यात आले. तर औद्योगिक वसहातीसाठी पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा आणि जालनासाठीची ४५० कोटी रूपयांची योजना मंजूर आहे, परंतु ती या ना त्या कारणाने रखडली आहे.एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवेंसेदिवस वाढत असल्याने ग्रामिण भागातून शेकडो कामगार हे रोजगार शोधण्यासाठी जालन्यात येत आहेत. त्यातच जालन्यातील उद्योगही संकटात असल्याने त्यांना काम देणे अडचणीचे ठरत आहे. जालन्यातील प्रमुख उद्योग म्हणून स्टील उद्योगाकडे पाहिले जाते. या उद्योगातील सात बड्या स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगांना दररोज ५ एमलएलडी पाणी लागते आणि औद्योगिक विभागाकडून संपूर्ण एमआयडीसीला केवळ दीड एमलएलडी पाणी मिळत आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून उपयोगात आणले जात आहे.जालन्यातील अनेक स्टील उद्योजकांनी पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी, तिच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शेततळ्यांचा आधारही या उद्योगाने घेतला आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने हे शेततळे भरले नसल्याने आज जवळपास लाखो रूपये हे टँकरच्या पाण्यावर उद्योजकांचे खर्च होत आहेत. एकूणच पाण्या अभावी शहरातील बांधकाम व्यवसायावरही परिणाम दिसून आला असून, अनेकांनी बांधकामे पुढे ढकलली आहेत.जालना : पाणीपुरवठा वाढविण्याचे प्रयत्नया संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक महांडळाचे औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुधीर नागे यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना आणि शेंद्रा येथील उद्योगांना थेट पाणीपुरवठा करण्यासाठी ४५० कोटी रूपयांची ७२ एमएलडीची योजना मंजूर आहे. परंतु ती योजना या ना त्या कारणाने रखडली आहे. या योजनेतून जायकवाडी धरणातून थेट जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात येणार होते; परंतु या योजनेचे काम सध्या कासव गतीने सुरू असले तरी ती लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. असे असले तरी जानेवारीअखेरपर्यंत जालन्याला सध्यापेक्षा दोनपट जास्तीचा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.- सुधीर नागे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ

टॅग्स :MIDCएमआयडीसीwater scarcityपाणी टंचाई