शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:36 IST

उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले असून, आज घडीला औद्योगिक वसहातीतील उद्योगांचा श्वास हा टँकरच्या भरवशावर सुरू आहे. जालना पालिकेने दररोज एमआयडीसला ५ एमएलडी पाणी द्यावे आणि महिन्याला ५० लाख रूपये घ्यावेत असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, तो सध्या नाकारण्यात आला असून, अंतर्गत जलवानीचे काम पूर्ण झाल्यावर यावर विचार करू असे पालिकेकडून सांगण्यात आले. तर औद्योगिक वसहातीसाठी पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा आणि जालनासाठीची ४५० कोटी रूपयांची योजना मंजूर आहे, परंतु ती या ना त्या कारणाने रखडली आहे.एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवेंसेदिवस वाढत असल्याने ग्रामिण भागातून शेकडो कामगार हे रोजगार शोधण्यासाठी जालन्यात येत आहेत. त्यातच जालन्यातील उद्योगही संकटात असल्याने त्यांना काम देणे अडचणीचे ठरत आहे. जालन्यातील प्रमुख उद्योग म्हणून स्टील उद्योगाकडे पाहिले जाते. या उद्योगातील सात बड्या स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगांना दररोज ५ एमलएलडी पाणी लागते आणि औद्योगिक विभागाकडून संपूर्ण एमआयडीसीला केवळ दीड एमलएलडी पाणी मिळत आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून उपयोगात आणले जात आहे.जालन्यातील अनेक स्टील उद्योजकांनी पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी, तिच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शेततळ्यांचा आधारही या उद्योगाने घेतला आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने हे शेततळे भरले नसल्याने आज जवळपास लाखो रूपये हे टँकरच्या पाण्यावर उद्योजकांचे खर्च होत आहेत. एकूणच पाण्या अभावी शहरातील बांधकाम व्यवसायावरही परिणाम दिसून आला असून, अनेकांनी बांधकामे पुढे ढकलली आहेत.जालना : पाणीपुरवठा वाढविण्याचे प्रयत्नया संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक महांडळाचे औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुधीर नागे यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना आणि शेंद्रा येथील उद्योगांना थेट पाणीपुरवठा करण्यासाठी ४५० कोटी रूपयांची ७२ एमएलडीची योजना मंजूर आहे. परंतु ती योजना या ना त्या कारणाने रखडली आहे. या योजनेतून जायकवाडी धरणातून थेट जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात येणार होते; परंतु या योजनेचे काम सध्या कासव गतीने सुरू असले तरी ती लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. असे असले तरी जानेवारीअखेरपर्यंत जालन्याला सध्यापेक्षा दोनपट जास्तीचा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.- सुधीर नागे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ

टॅग्स :MIDCएमआयडीसीwater scarcityपाणी टंचाई