शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:13 IST

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी भारत देशाला जगाच्या पाठीवर नेण्यासाठी केलेले अमूल्य कार्य आणि गोरगरीब, दीनदलितांच्या उध्दारासाठी महान कार्य केले आहे, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले.जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रितीसुधानगर येथील कार्यालयात गुरूवारी स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल होत्या. यावेळी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, न.प.गटनेते गणेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राजेंद्र वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना राजेंद्र राख म्हणाले की, भारत देश हा आज तंत्रज्ञान, विज्ञानामध्ये अग्रेसर आहे. याचा पाया स्व. इंदिरा गांधी यांनी रचल्यामुळे भारत देश हा स्वयंभू राष्ट्र म्हणून जगापुढे आलेले आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी गोरगरीबांच्या कल्यासाठी विविध योजना आणि महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे देशातील युवक आज शिक्षणाकडे वळलेला आहे. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या की, स्व. इंदिरा गांधी यांनी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे, ही बाब भारतीय नागरीक कधीही विसरणार नाही. भारत देश एकसंघ राहावा म्हणून त्यांनी दिलेले बलिदान काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समतेचे विचार घेवून सामाजिक कार्यात अग्रसेर राहावे आवाहन त्यांनी यावेळी केले.देशाचे तत्कालीन गृहमंत्री स्व. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या हितासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्तता मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य देश कधीही विसरू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.यावेळी शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांनी विचार मांडले. यावेळी नगरसेवक आरेफ खान, रमेश गोरक्षक, राधाकिसन दाभाडे, विनोद यादव, वैभव उगले, मोहन इंगळे, जगदीश ऐंगूपटला, राजू पवार, नारायण वाढेकर, शेख इस्माईल, रामेश्वर पवार, सीताराम विटेकर, अंकुश गायकवाड, राजू साबळे, शेख अकबर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवक काँग्रेसचे किशोर शिंदे यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी