शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:13 IST

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी भारत देशाला जगाच्या पाठीवर नेण्यासाठी केलेले अमूल्य कार्य आणि गोरगरीब, दीनदलितांच्या उध्दारासाठी महान कार्य केले आहे, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले.जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रितीसुधानगर येथील कार्यालयात गुरूवारी स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल होत्या. यावेळी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, न.प.गटनेते गणेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राजेंद्र वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना राजेंद्र राख म्हणाले की, भारत देश हा आज तंत्रज्ञान, विज्ञानामध्ये अग्रेसर आहे. याचा पाया स्व. इंदिरा गांधी यांनी रचल्यामुळे भारत देश हा स्वयंभू राष्ट्र म्हणून जगापुढे आलेले आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी गोरगरीबांच्या कल्यासाठी विविध योजना आणि महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे देशातील युवक आज शिक्षणाकडे वळलेला आहे. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या की, स्व. इंदिरा गांधी यांनी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे, ही बाब भारतीय नागरीक कधीही विसरणार नाही. भारत देश एकसंघ राहावा म्हणून त्यांनी दिलेले बलिदान काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समतेचे विचार घेवून सामाजिक कार्यात अग्रसेर राहावे आवाहन त्यांनी यावेळी केले.देशाचे तत्कालीन गृहमंत्री स्व. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या हितासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्तता मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य देश कधीही विसरू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.यावेळी शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांनी विचार मांडले. यावेळी नगरसेवक आरेफ खान, रमेश गोरक्षक, राधाकिसन दाभाडे, विनोद यादव, वैभव उगले, मोहन इंगळे, जगदीश ऐंगूपटला, राजू पवार, नारायण वाढेकर, शेख इस्माईल, रामेश्वर पवार, सीताराम विटेकर, अंकुश गायकवाड, राजू साबळे, शेख अकबर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवक काँग्रेसचे किशोर शिंदे यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी