शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:13 IST

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी भारत देशाला जगाच्या पाठीवर नेण्यासाठी केलेले अमूल्य कार्य आणि गोरगरीब, दीनदलितांच्या उध्दारासाठी महान कार्य केले आहे, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले.जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रितीसुधानगर येथील कार्यालयात गुरूवारी स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल होत्या. यावेळी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, न.प.गटनेते गणेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राजेंद्र वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना राजेंद्र राख म्हणाले की, भारत देश हा आज तंत्रज्ञान, विज्ञानामध्ये अग्रेसर आहे. याचा पाया स्व. इंदिरा गांधी यांनी रचल्यामुळे भारत देश हा स्वयंभू राष्ट्र म्हणून जगापुढे आलेले आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी गोरगरीबांच्या कल्यासाठी विविध योजना आणि महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे देशातील युवक आज शिक्षणाकडे वळलेला आहे. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या की, स्व. इंदिरा गांधी यांनी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे, ही बाब भारतीय नागरीक कधीही विसरणार नाही. भारत देश एकसंघ राहावा म्हणून त्यांनी दिलेले बलिदान काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समतेचे विचार घेवून सामाजिक कार्यात अग्रसेर राहावे आवाहन त्यांनी यावेळी केले.देशाचे तत्कालीन गृहमंत्री स्व. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या हितासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्तता मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य देश कधीही विसरू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.यावेळी शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत यांनी विचार मांडले. यावेळी नगरसेवक आरेफ खान, रमेश गोरक्षक, राधाकिसन दाभाडे, विनोद यादव, वैभव उगले, मोहन इंगळे, जगदीश ऐंगूपटला, राजू पवार, नारायण वाढेकर, शेख इस्माईल, रामेश्वर पवार, सीताराम विटेकर, अंकुश गायकवाड, राजू साबळे, शेख अकबर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवक काँग्रेसचे किशोर शिंदे यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी