शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सर्दी, खोकल्याच्या रूग्ण संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

वडीगोद्री : अंबड तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून, वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ ...

वडीगोद्री : अंबड तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून, वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश घरांमध्ये या आजाराचे रूग्ण आहेत. विशेष म्हणजे सर्दी, खोकला, ताप आदी कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा होतो की काय ? अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

तालुक्यात आधीच्या पावसाळी वातावरणानंतर काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी-जास्त होत असून वातावरणात मोठ्या प्रमाणात गारव्यासह उष्णताही निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरातील थंडी अचानक गायब झाली होती व वातावरण गरम व ऊबदार बनले होते. त्यानंतरच्या काळात थंडीने अचानक जोर घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घराघरांमध्ये सर्दी, खोकला व इतर ताप सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. हे रुग्ण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. शिवाय ग्रामीण भागात टायफॉईड, मलेरिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आला आहे. परंतु, थंडीच्या काळात नागरिकांनी काळजी न घेतल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. अनेकजण विनामास्क बाहेर फिरत आहेत. कोरोनाचा फैलाव पाहता नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

नागरिकांनी दक्षता घ्यावी

थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला, ताप आदी आजार झाले तर कोरोना झाला असे नाही. त्यामुळे तज्ज्ञांमार्फत योग्य औषधोपचार घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सूचनांचे पालनही सर्वांनी करणे महत्त्वाचे आहे.

डॉ. सुशील जावळे

प्राथमिक आरोग्य केंद्र, वडीगोद्री