शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

वर्गखोल्यांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

बाळासाहेब गवले माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी जवळपास १५ वर्गखोल्या कमी पडत आहेत. वर्गखोल्या ...

बाळासाहेब गवले

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी जवळपास १५ वर्गखोल्या कमी पडत आहेत. वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेतील सर्व वर्ग पूर्ववत सुरू होण्यापूर्वी या वर्गखोल्यांची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.

माहोरा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते दहवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक हजारांवर विद्यार्थ्यांसाठी या शाळेत असलेल्या वर्गखोल्या कमी पडत आहेत. शाळेत दहावीच्या चार तुकड्या, नववीच्या चार तुकड्या, आठवीच्या चार तुकड्या, सातवीच्या तीन तुकड्या, सहावीच्या तीन तुकड्या, पाचवीच्या तीन तुकड्या अशा एकूण २१ तुकड्या आहेत. त्यामुळे या शाळेसाठी वाढीव १६ वर्गखोल्यांची गरज आहे. अपुऱ्या वर्गखोल्यांमुळे शाळा नियमित सुरू असताना विद्यार्थ्यांची गैरसोय होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर वर्गही लवकरच सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्गखोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने नवीन वर्गखोल्यांना मंजुरी देऊन बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थ, पालक करीत आहेत. दरम्यान, या शाळेतील मुख्याध्यापक पदासह एक सुपरवायझर, माध्यमिकचे गणिताचे शिक्षक, पदवीधरचे पाच शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्तपदेही तातडीने भरण्याची गरज आहे.

शिक्षण विभागाकडे पाठपुरावा

शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांची प्रत्यक्षात भेट देऊन शाळेतील समस्या मांडल्या आहेत. या समस्या सोडविण्याबाबत चर्चाही करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या पाहता या शाळेतील वर्गखोल्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा.

संतोश वरपे

अध्यक्ष, शालेय समिती

वर्गखोल्यांच्या समस्येसह रिक्तपदांबाबत वरिष्ठांना अहवाल दिला आहे. शालेय समितीसह ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा पाठपुरावाही याबाबत सुरू आहे. आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.

श्रीकृष्ण चेके

प्रभारी मुख्याध्यापक, माहोरा

ग्रामस्थांचे निवेदन

शाळेतील विविध समस्या सोडविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी निमा अरोरा, शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. शिवाय सरपंच वैशाली कासोद, उपसरपंच गजानन साळोक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हाले, शालेय समिती अध्यक्ष संतोष वरपे, उपाध्यक्ष सुखदेव खरसान, संतोष गौरकर, आदी पदाधिकारीही शाळेचा प्रश्न सोडविण्यासाठी पठपुरावा करीत आहेत.