शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:34 IST

मंठा शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क मंठा : तालुक्यात गेल्या काही ...

मंठा शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मंठा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी मंठा येथील आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागली.

गतवर्षात कोरोना महामारीमुळे सात ते आठ महिने आठवडा बाजार बंद होता. त्यावेळी भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. बहुतांश शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागला. त्यामुळे भाजीपाल्याच्या लागवडीत मोठी घट झाली. परिणामी, भाजीपाल्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले होते. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवहार सुरळीत झाले होते. त्यातच विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. दरही स्थिर झाले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लागवड केलेला भाजीपाला कुठे विकावा, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.

शहरात कोरोनाच्या नियमांचा फज्जा

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद केला असला, तरी शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलीस तसेच नगर पंचायतीचेही दुर्लक्ष होत आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

===Photopath===

280221\28jan_9_28022021_15.jpg

===Caption===

मंठा शहरात शेतकर्यांना रस्त्यावरच बसून भाजीपाला विकावा लागत आहे.