शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शासकीय योजनांची गतीने अंमलबजावणी करा- बिनवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरात घनवन प्रकल्प राबवणार जालना : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. योजनेसाठी मोठ्या ...

प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरात घनवन प्रकल्प राबवणार

जालना : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देण्यात येतो. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले की, शासनाच्या योजना राबवत असताना प्रत्येक शासकीय विभागांचा एकमेकांशी संबंध येत असतो. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या विभागांच्या परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्र आदींची आवश्यकता असते. त्यामुळे शासनाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी प्रत्येक विभागाने एकमेकामध्ये समन्वय साधून काम करण्याची गरज आहे. योजना राबविण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या जिल्हा प्रशासनाला कळवाव्यात. योजना राबविण्यामध्ये असलेल्या अडचणी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर पाठपुरावा करून दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर यापुढे प्रत्येक विभागाचा योजनानिहाय आढावा घेण्यात येऊन योजनांच्या प्रगतीबाबतची माहिती घेण्याबरोबरच योजना राबविताना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात येणार असल्याचेही बिनवडे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करून वृक्षांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातही वृक्ष लागवडीवर भर देण्यात यावा. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये घनवन वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याच्या विभागीय आयुक्तांनी सूचना दिलेल्या असून, त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये घनवन प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

गौण खणिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

सद्यस्थितीमध्ये ऊस कारखाने सुरू झालेले आहेत. उसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे. ऊसाची बैलगाडी अथवा ट्रॅक्टर, ट्रॉलीमधून वाहतूक होत आहे; परंतु या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अनेक वेळा अपघात घडतात. त्यामुळे उसाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रॉलीला रिफ्लेक्टर असतील याची काळजी घेण्याबरोबरच जालना जिल्ह्यामध्ये जे अपघात स्थळे आहेत, अशा ठिकाणी बोर्ड, रम्बलर यासारख्या उपाययोजना करण्यात याव्या. अवैधरीत्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.