शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शहराच्या विकासात अमर, अकबर, ॲन्थोनीच गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:32 AM

दुसरीकडे राजेश टोपे यांनी यावेळी अत्यंत सावध भूमिका घेत नेहमीप्रमाणे संयमी भाषण केले. त्यांनी शहराच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून ...

दुसरीकडे राजेश टोपे यांनी यावेळी अत्यंत सावध भूमिका घेत नेहमीप्रमाणे संयमी भाषण केले. त्यांनी शहराच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त केली. राज्य सरकारकडून शहराच्या विकासासाठी हवी ती मदत आपण याआधीदेखील केली असून, भविष्यातही ती करू, असे सांगितले; परंतु त्यांनी महापालिकेचा मुद्दा उपस्थित करून एक प्रकारे आमदार गोरंट्याल यांना डिवचले. याच मुद्द्यावरून सहा महिन्यांपूर्वी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे हे जालन्यात आले असताना माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी जालना पालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी देखील आ. गोरंट्याल यांनी त्याला प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळे टोपेंच्या आजच्या वक्तव्याकडे गोरंट्याल हे कसे पाहतात हे दिसून येणार आहे. रेल्वेच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपल्यावर जेवढे वार करण्याचे प्रयत्न होतात तेवढे आपण सक्षम होत असून, त्यातून आपली दिवसेंदिवस प्रगतीच होत असल्याचे सांगून पुलाच्या मुद्द्यावरून बाप काढण्याचा जो प्रकार मध्यंतरी केला गेला तो निंदणीय असल्याचे सांगून हा संस्काराचा भाग नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आपण सलग पाववेळा जनतेच्या प्रेमामुळेच विजयी झालो असून, आता सहाव्यांदाही एकदा लोकसभेची परीक्षा म्हणजेच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगून आपण आजही मैदान सोडले नसल्याचे त्यातून दाखवून दिले.

मेडिकल कॉलेज आणणारच

रेल्वेस्थानक येथे झालेल्या आपल्या भाषणात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १०३ कोटी रुपयांचे मनोरुग्णालय जालन्यात होणार आहे. त्याचा लाभ हा मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांना होणार आहे. या रुग्णालयामुळे जवळपास २५० डॉक्टर येथे रुजू होणार आहेत. दरम्यान, मेडिकल कॉलेज अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील जालन्यात आणणार असल्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. त्यात केवळ ते पीपीई तत्त्वावर की, संपूर्ण शासकीय यावर चर्चा सरू असून, यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही मदत लागेल, असे सांगितले.