शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

योजनांची गतीने अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:20 IST

मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी दुधाळ जनावरे वाटप प्रकल्पाच्या आढावा बेठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळभ खोतकर यांनी वरील निर्देश दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, ेमुख्यधिकारी संतोष खांडेकर, शिवसेना जिल्हा प्रमख भास्कर अंबेकर, पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद मोरे, वंसत जगताप, विष्णू पाचफुले तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि बँकांचे शाखा प्रमुख, विमा कंपनीचे व्यवस्थापक आदीची उपस्थिती होती.खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती बरोबरच जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी दुधाळ जनावरे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प जालना जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. तसेच या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज तातडीने भरुन घेण्यात यावेत. या लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सहतोपरी सहकार्य करावे. लाभार्थ्यांना उच्च प्रतिचे जनावरे देण्यासाठी राज्यात उपलब्ध असतील तर खरेदी करण्यात यावे, अथवा परराज्यातून दर्जेदार अशा जनावरांची खरेदी करण्यात यावी असे खोतकरांनी सांगितले. या बैठकीत उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने खोतकर जाम चिडले होते. त्यांनी हलगर्जी करणाºया अधिका-यांना कडक शब्दात सुनावले. काही माहिती विचारली असता ती देखील समाधानकारक देता न आल्याने पुढील बैठकीत सर्व आवश्यक ती माहिती सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या.जालना : प्रकल्प यशस्वी केल्यास राज्यभर राबवणारजनावराचा विमा शंभर टक्के काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत जालना जिल्ह््यामध्ये हा प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात याच धर्तीवर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले. पशुपालकांकडे असलेल्या जनावरांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी त्यांना ठरवून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी थांबून योग्य ती सेवा देण्याचे निर्देशही खोतकर यांनी यावेळी दिले. गेल्या काही दिवसांमध्ये अंबड, गोलापांगरी येथे उपचारा अभावी जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरgovernment schemeसरकारी योजना