शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हृदयरोग, ॲलर्जी असली तर कोरोना लस घ्यायलाच हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

जालना : ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. विविध आजार असलेले अनेक नागरिक ...

जालना : ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. विविध आजार असलेले अनेक नागरिक लसीकरणाबाबत संभ्रम व्यक्त करीत आहेत. या नागरिकांनी संभ्रमावस्था न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ६८५ वर गेली असून, त्यातील ४१९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर १७ हजार ८५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. प्रारंभी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर विविध आजार असलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु, विविध आजार असलेल्या नागरिकांमध्ये लसीबाबत संभ्रमावस्था आहे. ही संभ्रमावस्था दूर करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. अधिकाधिक नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात सर्वांनी लस घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ....

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने लसीकरणाबाबत वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. लसीकरण करताना आवश्यक त्या बाबींची तपासणी केली जात आहे. नागरिकांनी मनात कोणीतीही भीती न बाळगता लस घ्यावी.

- डॉ. पद्मजा सराफ

फिजिशियन

ज्यांना रक्तदाबाचा, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, ज्यांचे वय अधिक आहे, अशा नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. लसीबाबत मनात कोणतीही शंका घेऊ नये.

- डॉ. आशिष राठोड

हृदयरोगतज्ज्ञ

किडनीचे आजार, कॅन्सर, उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे असा आजार असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रशांत बांदल

किडनी विकारतज्ज्ञ

मधुमेहाचा त्रास असलेल्या नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींची प्रकृती कोरोनामुळे अधिक खालावत आहे. त्यामुळे मधुमेह बाधित नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी.

- डॉ. राजेश सेठिया

मधुमेहतज्ज्ञ

थंडी-ताप आला तरी घाबरू नये...

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही नागरिकांना ताप येणे, थंडी वाजण्याचा त्रास होऊ शकतो. असा त्रास झाला तर घ्यावयाची औषधे लसीकरणानंतर दिली जात आहेत. ती औषधे घेतल्यानंतर होणारा त्रास कमी होतो. परंतु, केवळ ताप, थंडीच्या भीतीने लसीकरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. लसीकरणाचा काहीच नागरिकांना त्रास होत असून, न घाबरता सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

३९१९६ जणांना आतापर्यंत दिली लस

१४१२५ इतक्या ज्येष्ठ नागरिकांना दिली लस