शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

आयसीटीमुळे उद्योगांना चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:04 IST

आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सिरसवाडी परिसरात आयसीटी संस्थेच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर वृंदावन हॉलमध्ये जााहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव, कुलपती रघुनाथ माशेलकर आदींची उपस्थिती राहणार आहे. जालन्यात ही संस्था यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण स्वत:, येथील उद्योजक आणि कुलगुरू डॉ.जी.डी यादव यांनी पाठपुरावा केला. त्याचे आज चीज होणार असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचे दानवे म्हणाले. दरम्यान आयसीटी प्रमाणेच ड्रायपोर्टमुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. या दोन महत्वाच्या बाबींसह जालन्यातील सिमेंटचे रत्स्यांसाठी १०० कोटी रुपये मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी. आ. अ‍ॅड. विलास खरात, भास्कर दानवे, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, आशिष मंत्री, मनोज पांगारकर, अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती.आयसीटी ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, १९३३ मध्ये मुंबईत सुरू करण्यात आली होती. या संस्थेने बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तसे अभ्यासक्रम तयार केले. त्यामुळेच या संस्थेला देशात अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान आहे. आता पर्यंत या संस्थेने देशातील आघाडीचे ५०० उद्योजक निर्माण केल्याची माहिती कुलगुरू डॉ.जी. डी. यादव यांनी दिली.४जालन्यात जूनपासून अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पाच वर्षाची पदवी तसेच पदव्युत्तर आणि नंतर डॉक्टरेटसाठी येथे संशोधन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पाच वर्षाच्या अभ्यासक्रमात दोन वर्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगात काम करावे लागणार असल्याने कामाचा अनुभव मिळून विद्यार्थ्यांत परिपक्वता येईल.पीएचडी करणाऱ्यांना येथील उद्योजकांकडून संशोधनासाठी विद्यावेतनही देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात जास्तीत जास्त उद्योजक घडविण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे कुलगुरू यादव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवे