शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आयसीटीमुळे उद्योगांना चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:04 IST

आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सिरसवाडी परिसरात आयसीटी संस्थेच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर वृंदावन हॉलमध्ये जााहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव, कुलपती रघुनाथ माशेलकर आदींची उपस्थिती राहणार आहे. जालन्यात ही संस्था यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण स्वत:, येथील उद्योजक आणि कुलगुरू डॉ.जी.डी यादव यांनी पाठपुरावा केला. त्याचे आज चीज होणार असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचे दानवे म्हणाले. दरम्यान आयसीटी प्रमाणेच ड्रायपोर्टमुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. या दोन महत्वाच्या बाबींसह जालन्यातील सिमेंटचे रत्स्यांसाठी १०० कोटी रुपये मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी. आ. अ‍ॅड. विलास खरात, भास्कर दानवे, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, आशिष मंत्री, मनोज पांगारकर, अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती.आयसीटी ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, १९३३ मध्ये मुंबईत सुरू करण्यात आली होती. या संस्थेने बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तसे अभ्यासक्रम तयार केले. त्यामुळेच या संस्थेला देशात अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान आहे. आता पर्यंत या संस्थेने देशातील आघाडीचे ५०० उद्योजक निर्माण केल्याची माहिती कुलगुरू डॉ.जी. डी. यादव यांनी दिली.४जालन्यात जूनपासून अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पाच वर्षाची पदवी तसेच पदव्युत्तर आणि नंतर डॉक्टरेटसाठी येथे संशोधन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पाच वर्षाच्या अभ्यासक्रमात दोन वर्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगात काम करावे लागणार असल्याने कामाचा अनुभव मिळून विद्यार्थ्यांत परिपक्वता येईल.पीएचडी करणाऱ्यांना येथील उद्योजकांकडून संशोधनासाठी विद्यावेतनही देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात जास्तीत जास्त उद्योजक घडविण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे कुलगुरू यादव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवे